BALHBODH KAVITA 

DEC 



मैने ये सोच के आस्मामें पत्थर उछाला नही 

चांद भी एक पत्थर है पत्थर से निराला नाही


हिंदुस्तानी हुं सबसे ज्यादा प्यार मां से है 

मा से चेहरा अलग है मगर मा से निराला नाही


तय नही कर पाया विराना है या मेरा घर 

ठीक तरह से देख सकू दिल में उतना उजाला नही 


उसने कहा के मेरे पास जीने का सली का नही 

शायद उसे अपने ही घर से किसी ने निकाला नही 


अभी भी खुदकुशी करने का मन नही करता 

अभी भी जिंदगीमें मेरे इतना घोटाला नही


अभी तो शुरू किया है देखते है कहा पहुंचते है 

अभी भी मैने रास्तों को कदमोंके के साईझ मे ढाला नही


फुरसतसे कयामत मे करेंगे जिंदगी का हिसाब

अभी तो मेरी जिंदगी का निकला दिवाला नही


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जीभ वजनाने हलकी पण जड तिची सलगी

तेव्हा जपून वाजव तुझी बोलण्याची हलगी


कधीही लागू शकते ही तुझ्या टाळूला 

वाळवंटात जाऊन भेटते अर्थाच्या वाळूला 


ती एकच अशी जी आहे देहाबाहेर उपस्थित 

कोणालाही कळत नाही कधी कापते कोणाची फीत 


बोलण्याआधी विचार कर नेमकेपणाचा पन्नास वेळा 

नाहीतर गाळात घेऊन जाईल तिचा गळ तिचा गळा


म्हणून तर तिला दिले आहे तोंड नावाचे म्यान 

कुलीन तलवारीसारखी दिसते तिचे व्यभिचारी खानदान 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

हे सगळे अत्यंत बिघडलेलले आहे 

हे झाड पूर्वीच कुणी ओरबाडलेले आहे 


तिचे डोळे आता आरोप करत सुटलेत 

प्रत्येक स्वप्न म्हणे मी धाडलेले आहे


ओढत नाही तोवरच प्रेमाचा दोर टिकतो 

फुलांनी त्याचे मटेरियल घडवलेले आहे


माझे अश्रू फक्त माझ्या बेडने पाहिलेत 

त्याचेही काळीज आता अवघडलेले आहे


कवीसुद्धा भेटले की पैशाची चर्चा करतात 

इतके शहराचे हवामान बिघडलेले आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

माहित नाही किती वादळे खाऊन गेली तुझ्या डोळ्यातील चमक 

वाऱ्यासारखी भिरभिरत ठेवते डेली तुझ्या डोळ्यातील चमक


कुठल्याही व्याख्येमध्ये बसत नाही तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य 

मला गणित करू देत नाही टॅली तुझ्या डोळ्यातील चमक 


तू कधी काय करशील त्याचा अंदाज बांधता येत नाही 

पाण्यासम खळाळते पण असते व्हॅली तुझ्या डोळ्यातील चमक 


तुला नटायला आवडते नटीसारखे फुलायला फुलासारखे 

जंगलाने थेट धाडलेल्या असतात वेली तुझ्या डोळ्यातील चमक


तू नोकरीही करतेस तरी आयुष्याची मालकी सांभाळतेस

संपत नाही स्वभावासारखी नाकेली तुझ्या डोळ्यातील चमक 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)



लहानपणापासूनच तुम्ही दरवाजे ठेवले उघडे 

आई भाऊ तुमचे आभार तुम्ही दिले नाहीत कपडे 


मला कधीच माहीत नव्हता दुष्ट तो शैतान 

तुम्ही मला धर्माशिवायच दिले जगण्याचे भान 


सर्व शक्तिमान देवाविषयी दिला नाही ठोसपणा 

कित्येक म्यानीपुलेशनपासून वाचला माझा भरघोसपणा


आभार तुम्ही नाळ कापली वंश कापला वर्ण जात कापले 

सूर्य काय आहे ते समजावले त्याच्याखालीच माझे शरीर तापले


आता चाललोय डौलाने पृथ्वीवर वांड म्हणून सांड बनून 

समाज बनून करत नाही कुठल्याच व्यक्तीचा खून 


श्रीधर तिळवे नाईक

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


जरी त्याच्या चेहऱ्यावर अळूमाळू आहे 

तो नम्र नाही थोडासा लाजाळू आहे


कधीकधी ढगासारखा ओला होतो 

एरव्हीं तो स्वभावाने पायाळू आहे 


हे खरे की त्याने प्रतिमा सभ्य ठेवलीये 

गरजूंना माहित तो किती कृपाळू आहे


संगणक कठोरच निघणार मला शंका नाही 

शेवटी त्याच्या मटेरियल मध्ये वाळू आहे


लोणी खाण्याचे दिवस कधीचे संपले 

त्यांच्या ताटात वाढलेले आता टाळू आहेत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


खूप काही आपल्यापासून दूर जात आहे 

आयुष्य आवाक्याच्या बाहेर होत आहे 


माहित नाही कसला काळोख आत लपलेला 

दिवा लावला तरी तिथे अंधार होत आहे 


थोडा तरी असण्याचा तुझ्या मला सुगावा दे 

मला आता तुझ्याविषयीच संशय येत आहे 


हे पडझड आहे की नाही काही कळत नाही 

एकत्र आहे असे वाटणारे जग विखरत आहे 


डोळे तरी मी आता किती वाढव णार 

दुर्बीण माझ्या मेंदूत बसून समजावत आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

बापाचा उपदेश २ श्रीधर तिळवे नाईक स्वतःलाच विचार प्रश्न आयुष्य तुझे कोण चालवते तू असा नादान तुझी सावली तुझा देह चालवते तू ज्याची फळे खातोयस ते झाड पूर्वी लावले होते नातवाने काय खायचे ठरव तुला त्याचे भविष्य चालवते जे करतात त्यांच्याच हातून इथे चुका होत असतात माकडसुद्धा झाडावरून खाली पडते मग देह चालवते जो मार्गावरून गेलाय आणि परतलाय त्याला विचार बाकी रेंगाळणारे किडे ज्यांना त्यांचें आयुष्य चालवते एक काठी सहज मोडते पण दहा काठ्या मोडत नाहीत तेच घर भक्कम बनते जे हे सनातन सत्य चालवते कितीही सोने असले तरी त्याने भूक भागणार नाही त्यासाठी अन्न पाहिजे आणि आयुष्य अन्न चालवते तू पन्नास टक्के आई आहेस पन्नास टक्के तुझा बाप असा सुमेळ आहे म्हणूनच तुझी काया आयुष्य नीट चालवते जो अतिथी दारू मागतो तो अतिथी अतिथी नाही अशांना घरातही घेऊ नकोस ज्याचे आयुष्य मद्य चालवते जिला दोन शेवट आहेत आयुष्य अशी काठी नाही दोन्ही बाजूने अनंत असणारी तुला एक रेघ चालवते ज्यांना तू प्राचीन समजतोस ते त्यांच्या काळी वर्तमान होते तुझे पूर्वज वर्तमान जगले नि तुलाही तुझे वर्तमान चालवते श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
अभिनयाचा करिअर म्हणून विचार करताना श्रीधर तिळवे नाईक जगात सर्वात लोकप्रिय कला अभिनय आहे यावरून सिद्ध आहे की लोक किती खोटेपणावर प्रेम करतात तेव्हा अभिनय करताना खोटं बोलण्याची कला तर मास्टर करत नाहीस ना स्वतःलाच विचार ग्लॅमरच्या नावाखाली एक थोतांड तर चालवणार नाहीस ना स्वतःलाच विचार काय आहे कवितेत लोकप्रियता नाही आणि अभिनयात लोकप्रियता आहे तुझ्या निर्णयामध्ये कला किती आणि लोकप्रियतेची आसक्ती किती स्वतःलाच विचार प्रत्येकालाच लोकप्रिय व्हावं वाटतं तुला ते कितपत वाटतं स्वतःलाच विचार लोक एकमेकांवर लादत असतात लोकप्रियता म्हणजे स्वतःला लोकांच्या वर लादणे काय स्वतःलाच विचार तू उत्तम अभिनेता आहेस पण तुझा अभिनय तुला माणूस म्हणून घडवायला किती मदत करतो स्वतःलाच विचार काय आहे एक उथळ व्यवस्था आहे जी सगळ्यांनाच उथळता देते अभिनय त्या उथळतेचे सारतत्व आहे का स्वतःलाच विचार लोक काय कायमच मागे लागतात अभिनयाच्या अभिनेत्यांच्या तुला लोक किती मागे लागून घ्यायचे आहेत स्वतःलाच विचार डॉक्टर होण्यापेक्षा अभिनेता होणे ज्या देशात ज्यादा प्रतिष्ठित असते त्या देशाची लायकी काय स्वतःलाच विचार आतला आवाज ऐक आणि अभिनय आतला आवाजसुद्धा शिल्लक ठेवेल का स्वतःलाच विचार श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
तुझी यात्रा आहे की फक्त दिखावा आहे की हा शिवसुद्धा तुझ्यासाठी देखावा आहे ऊठ सुठ जिथे तिथे फोटो काय काढतोस भक्ती म्हणजे फोटोमधला काय पुरावा आहे आलायस तर रिक्त मनाने नमस्कार कर अहंकाराचा तिथेही का भरलेला फुगावा आहे तुझ्यासारख्या लोकांमुळेच भक्ती बदनाम झाली देवानेसुद्धा पत्करलेला आता दुरावा आहे चप्पल चोरीला गेली यासाठी आभार मान पाय शाबूत आहे अजून चालण्यात रावा आहे मी जिथे होतो तिथे शिवाशिवाय काहीच नव्हते मला काय माहित भवती कावा की बारकावा आहे श्रीधर तिळवे नाईक (डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)
555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555तो पहिला मुलायम उबदार स्पर्श मेंदूत ठिणगी ठेवणारा एक अंगार स्पर्श
कित्येक स्पर्श आले त्यानंतर आयुष्यात त्यासारखा आला नाही असरदार स्पर्श
त्यामध्ये नेमके काय आश्वासक होते जे शोधत बसलो करत मी दारोदार स्पर्श
नैतिक आणि अनैतिक प्रश्नही पडला नव्हता कायमचा खाऊन गेला तो दाणेदार स्पर्श
त्या स्पर्शासाठी ताटकळत राहिलो मी कायमचा बनवून गेला एक इंतजार स्पर्श
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तू आलीस कि हृदय दुखावेल नको येऊ
मलाच माझे अस्तित्व चावेल नको येऊ
वेगळे व्हायचे ठरले ना आता चर्चा नको
चुकून तुला प्रेम देवता पावेल नको येऊ
मैत्रिणींना दाखवण्यासाठी सांत्वन कशाला
कधी ना कधी त्यांना सत्य गावेल नको येऊ
मी हिंदु तू मुसलमान इतके कारण पुरेसे आहे
ते लोकांना पटेल, समजावेल नको येऊ
शंभर मेणबत्या रोज दुकानात विकतो
न शमा न परवाना न वृक्ष न तू वेल नको येऊ
सुरुवातीपासून दोघे स्वतंत्र पारदर्शक होतो
लपून छपून प्रेम म्हणजे जेल नको येऊ
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

लोग शहरमें इन्सान ढूंढते हैं मै इन्सानोंमें शहर ढूंढता हुं यकीन कीजिए लोग उस शहर में मिलते हैं
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलींतून )

प्रत्येकाचे प्रेम वेगळे ते कधीही सारखे नसते वेगळे जीन्स वेगळे हृदय वेगळा मेंदू वेगळे नाव असते
वेगवेगळ्या वेळा असतात काही चांगल्या काही वाईट कधी कधी आर्ट असते कधी कधी गेम असते
कधी कधी मिळत नाही कधी खूप उशिरा मिळते योग्य रस्त्यावर असूनही चालण्याऐवजी कधी बसते
पटवण्यासाठी कधी कधी असह्य अशी बडबड करते कधी इतके गप्प की आवाज सुद्धा करत नसते
इतकी चर्चा करून सुद्धा काय आहे ते कळणार नाही ते त्यालाच कळते ज्याला एक दिवस ते येऊन डसते
कधी कधी तर असे होते आयुष्य गेले तरी कळत नाही काही वेळा तर एका क्षणात कळते आणि मनात वसते
ते नेहमीच गाफील असते म्हणून तर त्याचा खून होतो कधी कधी जो माराय आला त्याच्याच डोक्यात जाऊन बसते
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)

तू अशी बेड पाशी कोणता शहाणा सभ्य राहील
तूच सांग तुझ्यासाठी कोणता बहाणा सभ्य राहील

जिथे साऱ्या संस्कृतीचे कपडे जातात काढले 
सांग कसा त्या फिनोमिनाचा ताणाबाणा सभ्य राहील

प्रेम आहे की सेक्स आहे केल्याशिवाय कसे कळेल 
एक तर दाणा कुटला जाईल किंवा घाणा सभ्य राहील 

तू माझे कपडे उतरव मी तुझे कपडे उतरवतो 
एकतर राणी नग्न होईल किंवा राणा सभ्य राहील

झेपत नाही वांदा नाही भयाने प्रेमाचा कांदा होतो 
यापुढे त्वचा बाहेर ठेवून माझा बाणा सभ्य राहील

श्रीधर तिळवे नाईक 
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

लोक त्यांच्या हिशेबाने तुला मनात बनवत राहतील 
त्यांची माती त्यांची दृष्टी तुझे पुतळे बनत राहतील

तुला कळणार नाही काय काल्पनिक पातळीवर बनवले 
लाखो चेहरे फिक्शनच्या पाण्यात तुझे शिजत राहतील 

खरं काय ते माहित असतं पण कल्पनेत जगायचं असतं 
खोटे मेंदू खऱ्या मेंदूना पोचण्याआधीच काटत राहतील

जेव्हा कल्पना संपतील तेव्हा इतिहासाचा भडीमार होईल 
झक मारत तुझे वर्तमान भूतकाळात पोहोचत राहतील 

त्यापेक्षा आसपासच्या लोकांना तू काल्पनिक समज 
तू त्यांच्यावर कविता लिही ते तुला कवी समजत राहतील 

श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता  या काव्यफायलीतून)
सत्य आधीच्या व्यवस्थेचा मर्डर करते 
मग व्यवस्था नवी सत्याची हत्या करते 

तुमच्या ईश्वराशिवाय मी जगू शकतो 
ईश्वराला पुरून माझे अस्तित्व उरते 

मी फास्ट आहे आणि फ्रेश ही आहे 
तरी कसे माझ्या देहात शिळे उरते 

इतके वाचतो पण आजतागायत कळले नाही 
मी पुस्तकात चरतो की पुस्तक माझ्यात चरते 

धर्मग्रंथ वाचून येथे कोण शहाणा झाला 
ही अशी गोष्ट आहे जिला शहाणपण घाबरते 

मी पेठेंच्या क्लासला बसत नाही पेठेत बसतो 
पेठेतच माझे गणित आत्मविश्वासाने वावरते 

एक दिवस गेला तसा दुसरा गेला 
रात्र मात्र जात नाही ती माझ्या खोलीत काय करते 

श्रीधर तिळवे नाईक 
(बाळबोध कविता ह्या काव्यफाईलीतून )

संपूर्ण उमलायचे होते थोडे अपुरे राहिले 
आयुष्यभर चालायचे होते थोडे अपुरे राहिले 

खूप पिले एकमेकांसोबत चहा दुःख ओठ 
देह प्यायचे होते थोडे अपुरे राहिले

अनेक चेहरे घेऊन ती भेटत होती मला 
तिचे सर्व चेहरे पाहायचे होते थोडे अपुरे राहिले

खूप बारकाईने देह एकमेकाचे न्याहाळले 
आत्मेही न्याहाळायचे होते  थोडे अपुरे राहिले

रात्रीपर्यंत सोबत असायची रात्री निघायची 
सारी रात्र जागायचे होते थोडे अपुरे राहिले

श्रीधर तिळवे नाईक 
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


सभ्यतेच्या तऱ्हा तरा तरा 
चालून येतात त्यात मी उपरा 

कुठे कोण पूर्ण लक्षात राहतो 
नखरा जास्त थोडा चेहरा 

पिसाटीचा काटा कसा काढणार 
उतर जेव्हा ती म्हणते "उतरा "

दुःखांनी असा गिल्ला केला 
एकच सुख त्यास भरला कापरा 

मी आयुष्य कातरून ठेवले 
भरून गेला घराचा कानाकोपरा

 श्रीधर तिळवे नाईक 
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तू चहा पी आणि कपाला सुगंधित कर उष्टा पिईन माझ्या ओठाला सुगंधित कर
जाणतो तू फक्त आईला ओळखतेस मलाही ओळखशील डोळ्याला सुगंधित कर
मी विहीर आहे तुडुंब भरलेली तू वाकून बघ पाण्याला सुगंधित कर
तुझ्यासाठी हजारो मैल चालत जाईन तू फक्त एकदा माझ्या पायाला सुगंधित कर
आयुष्याचा अर्थ कधी सापडणार नाही दोन शब्द बोल या शब्दाला सुगंधित कर
मेडिकलचे ऍडमिशन तुला मिळून जाईल हा जो आजारी पडलाय त्याला सुगंधित कर
काळाचे काय ते आईन्स्टाईन बघून घेईल आत्ता या क्षणी ह्या क्षणाला सुगंधित कर
श्रीधर तिळवे नाईक

सत्य आधीच्या व्यवस्थेचा मर्डर करते 
मग व्यवस्था नवी सत्याची हत्या करते 

तुमच्या ईश्वराशिवाय मी जगू शकतो 
ईश्वराला पुरून माझे अस्तित्व उरते 

मी फास्ट आहे आणि फ्रेश ही आहे 
तरी कसे माझ्या देहात शिळे उरते 

इतके वाचतो पण आजतागायत कळले नाही 
मी पुस्तकात चरतो की पुस्तक माझ्यात चरते 

धर्मग्रंथ वाचून येथे कोण शहाणा झाला 
ही अशी गोष्ट आहे जिला शहाणपण घाबरते 

मी पेठेंच्या क्लासला बसत नाही पेठेत बसतो 
पेठेतच माझे गणित आत्मविश्वासाने वावरते 

एक दिवस गेला तसा दुसरा गेला 
रात्र मात्र जात नाही ती काय करते 

श्रीधर तिळवे नाईक 
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


काहीच केले नाही तरी बदनाम घर आहे 
माझ्या प्रसिद्धीचे कारण माझे सासर आहे

आकाश आकाश नसते अवकाश असते 
भूमीलाच वाटत राहते ते प्रियकर आहे

तू फक्त सवय होतीस जी तोडता येत नव्हती 
एकच प्रॉब्लेम कळण्यास झाला उशिर आहे 

माझ्या प्रेमाची तीव्रता मेंदूमध्येच होती 
हृदयामध्ये तिची फक्त एक वायर आहे

प्लग काढून टाकावा तसे तिने काढून टाकले 
फेकले असे की मी बिनकामाचा जोकर आहे 

हे धागे असे की शरीरात आढळत नाहीत 
आणि विरोधाभास असा जपणारे फायर आहे 

तिला वाचता वाचता आयुष्य संपून गेले
नि ती म्हणते मी तुझ्या आयुष्याचे फक्त कव्हर आहे

प्रेमात कधीच काही तसे सेफ नसते 
समजून घे रक्तामध्ये हा डेंजरस वावर आहे

निरमा वॉशिंग पावडर सारखी घरात आली 
माझ्या डागावरही आता तिचा अधिकर आहे 

काळ असाही वाहून जाईल तसाही वाहून जाईल 
आत्ताच जगून घे हा पाऊस क्षणभंगुर आहे 

एक चूक होती पण ती तिने सांभाळली नाही 
मीही लोकांना सांगत राहिलो तिचे बरोबर आहे 

श्रीधर तिळवे नाईक 
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

इस


संशय अतिरेकी आहे स्वभावात दाटत राहतो तो मुलायम गोळी झाडतो आपण फाटत राहतो
आरशात किती जणांना स्वतःची ओळख पटते चेहरा दिसतो पण अनोळखी वाटत राहतो
शेवटी प्रेमामध्ये कपडे काढावेच लागतात आणि कपडे काढण्यासाठी सेक्स घाटत राहतो

बुरखा काढण्यासाठी तिने शंभर वर्षे घेतली तो संपूर्ण त्वचेवर आहे फील दाटत राहतो
तिचे मूड बदलतात भेटीतील पुरुषांप्रमाणे कधी हा तर कधी तो तिला झपाटत राहतो
सेक्स सुखच निर्माण करतो सोशल गिल्ट दुःख समाज तुमचे सुख गिल्ट देत लाटत राहतो
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्य फायलीतून)

घाबरू नकोस आयुष्याला त्याला लय आहे आतील आवाज ऐकत रहा तो निर्भय आहे
सुंदर होण्यासाठी नको करू कुणास कॉपी स्वतःला सहज स्वीकार त्यात सौंदर्य आहे
नशीब नावाचे काहीही नसते कर्तुत्व बघ चांगल्या सवयी लावून घे कर्तुत्व सवय आहे
एक गेली तर दुसरी येईल शेवटी संध्या आहेत तुला वाटेल तिलाच निवड नपुसंकता भय आहे
चेहऱ्यावरचा प्रकाश म्हणजे हृदयातला प्रकाश स्वतःला उजळत ठेव शरीर त्याचे वलय आहे
मरणाचा कशाला आता विचार करतो आहेस मरण म्हातारपणासाठी राख तू तरुण वय आहे
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)



तू म्हणालीस नरकात जा
आणि मला ते नरक आठवले
जे तुझी आई
राजकारणी म्हणून चालवत होती
ते नरक
ज्यांच्या पैकी एक पृथ्वी होती
ते नरक
ज्यांच्यात मी जाऊन
पुन्हा हाकललो गेलो होतो
ते नरक
ज्यांना तू लीड करत होतीस
आणि मी ज्यांना फॉलो करत होतो
तू म्हणालीस
नरकात जा
मी म्हणालो
आपण नरकातच आहोत
तू रागाने म्हणालीस
मराठी कळत नाही का
गो टू हेल
मी म्हणालो अदर इज हेल
माझ्यासमोर तूच अदर आहेस
तर तुझ्या आत येऊ का
मग तू काहीच म्हणाली नाहीस
तुझे मौन स्वर्ग होते
आणि मी तुझ्या आत
अनंत स्वर्ग अनुभवत राहिलो
श्रीधर तिळवे नाईक

बांधून ठेवलेले घोडे उधळले
शरीरात राखलेले कोडे उधळले
खूप दिवस संयमाचा मधुमेह
मधमाशांनी पोळे गोडे उधळले
खूप इच्छा होत्या तिच्यासोबत
मेल्या जेव्हा तिने तोडे उधळले
नाते टिकवताना नात्याची हत्या
पझेसिव्हनेसने पोटफोडे उधळले
मला वाटले मी खूप चालून गेलो
नंतर कळाले फक्त जोडे उधळले
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतुन )

तू अशी बेडपाशी कोणता शहाणा सभ्य राहील
तूच सांग तुझ्यासाठी कोणता बहाणा सभ्य राहील




वादळ आले आवाज न करता आले
श्वासात माझ्या स्वतःचे सौंदर्य ठेवून गेले
प्रत्येकाकडे इथे आठ दहा उपाय होते
मग मरणारे का एवढे प्रश्न ठेवून मेले
प्रत्येक धोरणाला यांनी कुरण बनवले
आमच्या ताटात फक्त गवत वाढून गेले
जिथे तिथे आयुष्यावर दबाव वाढलेला
जे क्षण आले ते ओझे घेऊन आले
प्रत्येक माणसाने स्वतःवर कव्हर घातलेले
आत मध्ये काहीतरी गिचमिड लिहिलेले
मला अजून खूप खूप जगायचे आहे
तारुण्य खोलेल प्रत्येक कुलूप लावलेले
मॅच्युरिटी ऐश आहे तीही पुढे मी करीन
जगू द्या आता न्हवाळीतील क्षण उमललेले
चुंबनावर सुद्धा तू घड्याळ लावणार का
मला नकोत ओठ काळास बांधलेले
यशानंतर त्याला जबर माज चढला
मैत्रीचे का होते त्याने देखावे दाखवलेले
दोन शब्दांचा दिलासा होता दिला
बाकी सर्व फुफाटे पेपरात पेटवलेले
तिच्या सौंदर्याने की स्वभावाने जिंकले
डोळ्यातून आली की दार उघडून आतले
हसताना ज्यांचे डोळे उदास त्यांना विचारा
दुःखाने त्यांना किती खोलवर होरपळले
दहा वर्षाचा असताना एकवीस मी झालो
मला नका विचारू बालपण कसे गेले
तिला फक्त माझ्या विनोदात रस होता
तिला हसवता हसवता काळीज काळवंडले
आयुष्य कधी कोणाच्या नावावर करता येते
ज्याचे त्याचे शरीर ज्याच्या त्याच्यात एकवटलेले
आसपास माझ्या आयुष्याचे विखराव
आत काय आहे तरीही सहसळणारे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

ऐकून आहे डोळ्यांची स्वतंत्र भाषा आहे
भाषा तर खोटी असते डोळाही खोटा आहे?
तुझ्याशिवाय जगणारे करोडो लोक आहेत
माझी त्यात भर पडली एवढाच नवा मुद्दा आहे
मी एक विकल्प बुरख्यामधून बाहेर पडण्याचा
ही तर सोय झाली यात हृदयाचा कुठे ठोका आहे
भय ही आहे आणि हिंदू पोरगा ही हवा
मुद्दलापासूनच ताळमेळ हा चुकलेला आहे
मीही हवेतले प्रेम कधीच केले नाही
हृदय याच पृथ्वीवर राहते मातीचा ठोका आहे
दुकानदार असलो तरी कुठे व्यवहार जाणतो मी
काळजाची लेन देन आतबट्ट्यातला धंदा आहे
फुले विकणाराही कधी सुगंध विकत नसतो
पॅकेज डील म्हणून आलेला तो दैवी दुवा आहे
कशाला कारणे शोधतेस विरह हाच जर शेवट
हे अनालिसिस नाही हा तर तमाशा आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून )

कुठल्या बाईने पुरुषाला समाधानी केले चप्पल काढून घेतले अनवाणी केले
जळल्याशिवाय कोणाला प्रकाश मिळाला मी अंधारात माझ्या उजेडाला वाणी केले
मी आणि आणि आणि म्हणत राहिलो त्यांनी माझ्या आयुष्याला आणीबाणी केले
भावना ही ही तिची रणनीती होती तिने माझे शहर पाणी पाणी केले
माझ्यासाठी फक्त मीच असणार होतो मी स्वतःला दुर्मिळ गोष्टींच्या खाणी केले
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)

आयुष्या ,मला तू जगून घे हवे तसे तुला वागून घे
फुलपाखरे सुरवंटे झाली मुलायम काट्यांना बिलगून घे
खिडक्या उडाल्या पळून गेल्या दरवाजे उरलेत भोगून घे
जखमा वेळ काढतायत हा टाइमपासही जगून घे
स्मृतिभ्रंश झाला आयुष्याला आणखी आयुष्य मागून घे
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

हिरा उगळता येत नाही कोळसा उगळता येतो हिरा संपता संपत नाही कोळसा संपून जातो
मी प्रेमाला वासना समजलो तू वासनेला प्रेम आजही हा गैरसमज तुझ्यामाझ्यामध्ये गातो
गर्दी होती प्रतिमांची त्यात आपण कुठे होतो आरशांना आरसे काचांना काचा म्हणाल्या पाहतो
मी माझ्या शब्दांच्या मध्ये वजन ठेवत नाही जो अधिक बोलतो तो भाषेपेक्षा हलका होतो
मला मस्त झोप लागते प्रेमभंग झाले तरी स्वप्नातसुद्धा गीत गात मी पावसात मस्त नहातो
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्यफायलीमधून)

कानात बोळे आणि डोळ्यावर पट्टी होती 
या समाजाशी त्याची म्हणे चांगली गट्टी होती 

त्याने इज्जत नेहमी सभ्यतेनेच फाडली 
त्याच्या आवाजाची म्हणे खालची पट्टी होती 

माझ्या चुका तिच्या गल्लीतून जर्दा खाऊन परतल्या 
अहंकाराची तिच्या घरावर पानपट्टी होती

जवळ असून सुद्धा आयुष्य दिसत नाही 
ही नोटच अशी की नेहमी सुट्टी सुट्टी होती 

सूर्य शेवटी समुद्रातील एकांतात परतला 
शेवटपर्यंत कळले नाही ही सजा की सुट्टी होती

श्रीधर तिळवे नाईक 
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)

खरे तर गोष्ट साफ आहे
फक्त आरसा गेला पळून आहे
सत्तेच्या बुडाखाली बुडबुडे
सर्वत्र पाणी मात्र गायब आहे
सत्तेने आहे जो तो माजलेला
आणखी किती माज शिल्लक आहे
ते सभ्यतेने करप्शन करतात
बाकीच्यांचा गुन्हा असभ्य आहे
आंधळ्यांच्या हाती डोळ्यांचे नेतृत्व
काढलेली म्हणे दृष्ट आहे
प्रत्येकाची मते विक्रीस लागलेली
तिथेही चालू म्हणे सेल आहे
खरे तर रिप्लेसमेंटची वेळ झाली
प्लेस कुणास करावे हा प्रश्न आहे
जिथे सगळ्यांच्याच हातात सुरे
तिथे गांधींचे काय काम आहे
म्हणा पुन्हा इंदिरा इज इंडिया
कोणाला इंडिया माहित आहे
प्रेत सर्व बाजूने खाल्ले गेले
हाडावरती चालू भांडण आहे
लोकशाहीस खांदा द्यायला निघालो
आणि माझा खांदा निखळत आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्य फायलीतून)

जीवनासाठी शब्द उथळ आहेत नाईलाजाने तयार झालेले बळ आहेत
माणूस म्हणजे निसर्गाने तयार केलेले टीव्ही निसर्गाला बोलायचे असते स्वतःशी त्याचे ते स्वबळ आहेत
प्रत्येक क्षण सण नाही जोक आहे हसता आले तर हसण्याची कळ आहेत
कुणासाठी शिव आहेत कोणासाठी शिवी शब्द कोणासाठी बासरी वाजवणारे पाणी कोणासाठी त्या पाण्याची ओंजळ आहेत

प्रेमाने मला माझी खरी औकात दाखवली
मला कळाले माझे शब्द फुटकळ आहेत
उन्हाळ्यातही सूर्य असतो थंडीतही सूर्यच ऋतू सूर्याचे नव्हे पृथ्वीस लागलेले चळ आहेत
प्रेमाच्या नावाखाली वासनेचे धाकडधिंगाणे तू टाळू शकणार नाहीस ते शरीराने मिळवलेले पाठबळ आहेत
कुठेही जा कशीही जा कधी ना कधी खिंडीत भय गाठणारच धोके तर आयुष्यात अपरिहार्यपणे अटळ आहेत
सगळे आयुष्य त्याचे विचारात गेले आता तो म्हणतो विचार तारांबळ आहेत
हजारदा म्हणेन मुस्लिम लडकी वर प्रेम केले तू काहीही म्हण माझ्यासाठी ते क्षण सुगंधी दरवळ आहेत
शब्द संपले की युद्ध सुरू होईल वाटाघाटी संपवू नकोस त्या शांतीच्या बळ आहेत
सावल्या पडण्यासाठी सुद्धा प्रकाश हवा असतो उन्हाला शत्रू मानू नकोस किरणे आधारबळ आहेत

तुला तुझेच आयुष्य जगावे लागेल हा ऑप्शनल प्रश्न नाही म्हणूनच तुझ्या उरावर उत्तरांचे अत्तरचळ आहेत
मी ही माझ्या छातीवर दगड ठेवून बघितले श्वास सुद्धा असे झाले जणु हवेतले मळ आहेत
कॉलेजात आल्यावर दप्तर थोडे हलके झाले बाकी नोट्स बुक म्हणजे कागदी वर्दळ आहेत
लोक काय कोणालाही मान्यता देतात शहाण्यांच्या मान्यता विमानतळ आहेत
जे दत्तक घ्यायला सुद्धा धार्मिक. मनाई करतात अशा धर्मात काय परिवर्तन होणार असे धर्म गळ आहेत
जे धर्मातून जाणाऱ्यांना मारतात ठार असे धर्म माझ्यासाठी फक्त कट्टर वर्दळ आहेत
तू चुकीच्या जागी जन्मलीस हाच एक गुन्हा झाला ती जागाच अडथळा झाली तिथेच सारे खळखळ आहेत
माझ्यातले काहीही तू हिसकावून घेऊ शकत नाहीस ज्या हिसकावल्यास त्या गोष्टी उथळ आहेत
तुझा स्पष्टवक्तेपणा प्रत्यक्षात क्रौर्य आहे तुझे शब्द चाकूंचे अवतारबळ आहेत
तुला ज्या कळतात त्या तुझ्या पुरत्याच मेंदूत मृग इतरांच्यासाठी त्या गोष्टी कदाचित मृगजळ आहेत
तू म्हणालीस म्हणून मी नमाज सुद्धा पढून पाहिला माझा नास्तिकपणा गेला नाही बहुदा धर्म माझ्यासाठी ढळ आहेत

माझी खरी ताकद माझ्या निरागसपणात आहे नदीसाठी आसुसलेले माझ्या आत ओहळ आहेत
आयुष्य म्हणजे माझ्या वाट्याला आलेला काळ आणि वाहून जायला त्याला शेकडो नळ आहेत
हा माझा गुन्हा नाही या वयात परिपक्वता आली तुम्ही समजा मला कुमारवयात लागलेले म्हातारचळ आहेत
जितके समजवावयाचे होते तितके समजावले शेवटचे सांगतो माझे प्रेमझरे निखळ आहेत
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)

खुदको झूठ बोलना सीखा रहा हु तुम पटोगी मुझे पटा रहा हु
तुम कहा खूबसूरत हो मेरी जान मै चाहके तुम्हे खूबसूरत बना रहा हू
जिंदगी तुमबीन उदास गुजर जाती सोचके की जिंदगीसे धोखा खा रहा हु
तुमने हा कहा और टेन्शन दूर हो गया अब दिल से ना आता है तो कह "ना" रहा हुं
जब तक बनती है तब तक बनते रहो वो भी बना रही है मै भी बना रहा हुं
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)

फळ तोडताही येते आणि पाडता येते शेवटी झाडाला येते आणि झाड झाडता येते
प्रेम तिथे सुरुवातीला दिखावाही नि देखावाही असणार हळूहळू एकमेकांच्या पारदर्शकतेत वाढता येते
इथे आपल्या प्रेमात सुद्धा धर्म हा एक मुद्दा आहे आणि लोक म्हणतात की या देशात धर्माला खोडता येते
मीही अवघडलो तर सगळे संबंध अवघड होतील अन्यथा मलाही तुझ्याप्रमाणे अवघडता येते
मामला शरीराचाच असता तर फार बरे झाले असते शरीराचे काय शरीराला कुठूनही काढता येते
बघता बघता डोळ्यादेखत संबंध व्यसन बनत गेले आणि मी या भ्रमात राहिलो की तुला ताडता येते
आत एक अस्वस्थता आहे अन हृदय दोलायमान वाट पहावी की तुला सोडावे काय केल्याने प्रेम सोडता येते
तू ज्याच्याकडे गेलीस तो जनावर आहे एकच लक्षात ठेव जनावराला जंगलात धाडता येते
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)


हिरा उगाळता येत नाही कोळसा उगळता येतो हिरा संपता संपत नाही कोळसा संपून जातो
मी प्रेमाला वासना समजलो तू वासनेला प्रेम आजही हा गैरसमज तुझ्यामाझ्यामध्ये गातो
गर्दी होती प्रतिमांची त्यात आपण कुठे होतो आरशांना आरसे काचांना काचा म्हणाल्या पाहतो
मी माझ्या शब्दांच्या मध्ये वजन ठेवत नाही जो अधिक बोलतो तो भाषेपेक्षा हलका होतो
मला मस्त झोप लागते प्रेमभंग झाले तरी स्वप्नातसुद्धा गीत गात मी पावसात मस्त नहातो
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्यफायलीमधून)

निवडणूक प्रचार करायला पहिल्यांदाच नकार देताना श्रीधर तिळवे नाईक
जेव्हा सर्व बाजूंनी चोर असतात निवडणूक लढवणारे तेव्हा दरोडेखोर असतात
कुणाचा पायपोस कोणाच्यात राहत नाही सगळ्यांचेच कपडे हरामखोर असतात
कोणाला जनतेशी काही कर्तव्य नसते आम्हाला मते द्या एवढ्यावरच जोर असतात
अनेकदा नेते झोपी जातात निवांत त्यांच्या कार्यकर्त्यांनाच रात्री घोर असतात
अशा ह्या निवडणुकीत नका बोलवू मला मला काळीज गमवायचे नाही माझ्या काळजात मोर असतात
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीमधून)

डोळे वाचायला जातो डोळ्यात ब्रेल लिपी असते मी म्हणतो प्रेम आणि ती झालेली आंधळी असते
आयुष्य तर असेही आणि तसेही निघून जाते जगतो तो ज्याच्या खांद्यावर आनंदाची पालखी असते
तिच्या रागावर तर आपण फुल टू फिदा आहोत सरळ नाक तप्त असते सुरवातीला संतापलेली असते
मलाही वाटत राहते की आमची फक्त मैत्रीच आहे शरीराने नकळत पण एक किल्ली फिरवलेली असते
प्रेम काहीही करू शकते प्रेम काहीही बदलू शकते बघता बघता वाघीण बनते जी मांजर बनून आलेली असते
बुर्का असा काढते जसा सिंहासनाचा त्याग करतीये माहित नाही कुठली राजवट तिने निर्माण केलेली असते
मित्रांनो आयुष्याचा निम्मा वेळ तिला द्यावा लागतो उरलेला वेळ माझ्या मागे रोजची दुकानदारी असते
फार वाट पाहत नसतो सरळ तिच्या घरात घुसतो तुम्ही शिव्या घाला म्हणा याची प्रीत अघोरी असते
आत्ताच कशाला विचार करू कोण कोण आडवं येणार मी यातच खुश आहे ती माझ्या दारात उभी असते
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

गुलाबाशिवाय असलेले काटे वाट्यास आले वाटा मिळाल्या नाहीत फाटे वाट्यास आले
जो जो जवळ होता तो परका होत गेला संवाद तुटत गेले सन्नाटे वाट्यास आले
मित्रांसाठी नेहमी आयुष्य गहाण ठेवले मित्र सावकार झाले ताठे वाट्यास आले
भिंतींनी बनले घर जमीन खाली राहिली खिडक्या हवेत गेल्या ढगसाठे वाट्यास आले
एक तर आहे देखावा किंवा दिखावा आहे दोन्ही जमले त्याच्या वाटे वाट्यास आले
आग आयुष्याची शेवटपर्यंत कळली नाही दिसले नाही वारे फुफाटे वाट्यास आले
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आंधळ्यांचे डोळे गेले आंधळ्यांचे काय गेले ज्यांना दिसत होते ते जागच्या जागी मेले
अस्तित्वाचा निरम्याने न कपडा निर्मळ होतो हिंसेचे डाग अमर ते मेल्यानंतरच गेले
बुडताना तिच्या प्रेमात मी ओला होत नव्हतो माझ्या वाट्यास आले नेहमी दमट तजेले
मला चंद्र नको होता जमीन हवी होती हवेत उडत राहिले शरीराचे तिच्या शेले
मी मुसलमानही झालो तिच्या प्रेमामध्ये नि ती म्हणत राहिली तुझे हिंदुत्व नाही गेले
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीमधून)

इकबाल के नाम श्रीधर तिळवे नाईक
नींद बेवफा है और इल्जाम ख्वाबो पर कितने थोप दिये है एक्झाम ख्वाबो पर
आसू पोछ दिये जैसे हाथ हवेली हो बाकी सब छोड दिये इंतजाम ख्वाबो पर
जमी तो रख दी मेरी खुदा के नाम अपने पास और कहा गुजरेंगे दिन तमाम ख्वाबो पर
उनके शायराना मिजाज सिर्फ दिखावा है वो रख देते है फिलहाल इंतकाम ख्वाबो पर
इकबाल तूने पाकिस्तान मांगा तेरे उर्दू से मुझे क्या काम सामने थे मगर रखे तूने अंजाम ख्वाबो पर
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

खुदको झूठ बोलना सीखा रहा हु तुम पटोगी मुझे पटा रहा हु
तुम कहा खूबसूरत हो मेरी जान मै चाहके तुम्हे खूबसूरत बना रहा हू
जिंदगी तुमबीन उदास गुजर जाती सोचके की जिंदगीसे धोखा खा रहा हु
तुमने हा कहा और टेन्शन दूर हो गया अब दिल से ना आता है तो कह "ना" रहा हुं
जब तक बनती है तब तक बनते रहो वो भी बना रही है मै भी बना रहा हुं
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)

क्या था वो प्यार था दिल का किया इजहार था
फिर हम दोनो भागे फिर एक दुसरे का इंतजार था
पता नही चला क्या ढूंढ रही थी मिलेगा जरूर ऐतबार था
गुस्सा तो उसका जायज था बस प्रॉब्लेम ये थी बार बार था
पता नही अब कब लोटेगी लौटेगी गर प्यार समझदार था
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)

एक कोल्हाच असतो जो सर्कशीत नसतो आणि एक रिंग मास्टर जो माणसात असतो
मी भावूक झालो की मला येतो राग अतिराग आला कि शांततेत जाऊन बसतो
एकांतात मला अजूनही राहता येत नाही समाजात जाऊन राहावं तर समाज डसतो
तू कसा पाहतोस त्यावर सर्व काही अवलंबून जगास कॉमेडी म्हणून बघतो त्याचा आत्मा हसतो
आयुष्याबाहेरचे कुठे काय स्वप्नात असते आणि तू तर स्वतःच्या स्वप्नात असतोच असतो
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून

फिर से मुझे किसी ने ना कहा समंदर खोल उठा सिर्फ एक आसू बहा
फिर से किसीने मेरी हैसियत निकाली फिरसे मैने हालतको तकियों में सहा
गरुर के लिए कहा बदनमें जगह थी दिल चकनाचुर होके दिलमेही रहा
शायद युजही करना था मुझे उसने किया मै युज्ड मालकी तरह कोनोमे पडा रहा
भूलना तो चाहता था मै भी एक हादसा मगर बनके काटा दिनरात महकता रहा
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)

मुझे कौन सा इश्क का तजूर्बा हैं एक दिल हैं और एक तर्जुमा हैं
ये इश्क के लिए मरना वरना छोड ये मुकद्दरके साथ दिलने लिया पंगा है
चांद देखने कौन जायेगा रात मे मुझे तो काफी तेरा खूबसूरत चेहरा है
शृंगार कौन गिनेगा शृंगारके समय जानता हूँ तू आखरी तू पहला है
मिलन हुआ अभी तक पता नही कौन किसके वजूद का हिस्सा है
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

माझ्या आई-वडिलांच्या मधले प्रेम माझ्या वडिलांचे स्वगत श्रीधर तिळवे नाईक जोवर दोघांच्यातून विस्तव जातोय तोवर वास्तव टिकणारे आहे
जे आहे ते प्रेम आहे आणि ते विस्तवात जगणारे आहे
तिला माहित माझे प्रेम आहे मला माहित नाही तिचे काय पण मला माहीत की जे आहे ते तिला माहीत असणारे आहे

शरीरांच्यात कुठे अंतर आहे अंतराय नावाचे तर काहीच नाही फक्त एकच दिलासा आहे आपणालाही कुणी बघणारे आहे
नाराज व्हायला अपेक्षा नाहीत आनंदाला निमित्त पुरत आहे कायमचे काहीच मानत नाही तात्कालीक पण वाहणारे आहे

वारा वाहिला की झुळूक बनते पारा आला की आरसा बनते फेटाळून लावते सर्व मुखोटे चेहऱ्यांना जिवंत ठेवणारे आहे
कळत नाही पण भावते आहे दिसत नाही पण धावते आहे रक्तातील उंबरे वितळून जातात पण घराचे दार सांभाळणारे आहे
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

मी माझ्यासोबत आहे कदाचित बॅड कंपनी आहे दुकान ठेवू की काढू बार ? आत खणाखनी आहे
ती आलेली नाही म्हणून कदाचित अस्वस्थता वाटेवरती डोळे आणि आत तनातनी आहे
हुतात्मा पार्कात बुरख्यामधून फुलवार सांगते आजच्या युगाचासुद्धा हनी मनी मनी आहे
चेहरा पाहण्यास आईस्क्रीम खायला घालावे लागते सोळंकी कोल्ड्रिंक्समध्ये बर्फ सनातनी आहे
आली आणि निघून गेली निघून गेली आणि आली दरम्यान आयुष्यामध्ये धंदा आणि पापणी आहे
श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून)





अभिनयाचा करिअर म्हणून विचार करताना श्रीधर तिळवे नाईक

जगात सर्वात लोकप्रिय कला अभिनय आहे
यावरून सिद्ध आहे की लोक किती खोटेपणावर प्रेम करतात

तेव्हा अभिनय करताना
खोटं बोलण्याची कला तर मास्टर करत नाहीस ना
स्वतःलाच विचार

ग्लॅमरच्या नावाखाली एक थोतांड तर चालवणार नाहीस ना
स्वतःलाच विचार

काय आहे
कवितेत लोकप्रियता नाही आणि अभिनयात लोकप्रियता आहे
निर्णयामध्ये कला किती आणि लोकप्रियतेची आसक्ती किती स्वतःलाच विचार

प्रत्येकालाच लोकप्रिय व्हावं वाटतं
तुला ते कितपत वाटतं
स्वतःलाच विचार

लोक एकमेकांवर लादत असतात
लोकप्रियता म्हणजे स्वतःला लोकांच्या वर लादणे काय
स्वतःलाच विचार

तू उत्तम अभिनेता आहेस
पण तुझा अभिनय तुला माणूस म्हणून घडवायला किती मदत करतो
स्वतःलाच विचार

काय आहे एक उथळ व्यवस्था आहे जी सगळ्यांनाच उथळता देते
अभिनय त्या उथळतेचे सार तत्व आहे का
स्वतःलाच विचार

लोक काय
कायमच मागे लागतात अभिनयाच्या अभिनेत्यांच्या
तुला लोक किती मागे लागून घ्यायचे आहेत
स्वतःलाच विचार

डॉक्टर होण्यापेक्षा
अभिनेता होणे
ज्या देशात ज्यादा प्रतिष्ठित असते
त्या देशाची लायकी काय स्वतःलाच विचार

आतला आवाज ऐक
आणि अभिनय आतला आवाजसुद्धा शिल्लक ठेवेल का
स्वतःलाच विचार

श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)





***************************************

------------**
बाईने पुरुषाकुठल्या
 ला समाधानी केले 
चप्पल काढून घेतले अनवाणी केले 

जळल्याशिवाय कोणाला प्रकाश मिळाला 
मी अंधारात माझ्या उजेडाला वाणी केले 

मी आणि आणि आणि म्हणत राहिलो 
त्यांनी माझ्या आयुष्याला आणीबाणी केले 

भावना ही ही तिची रणनीती होती 
तिने माझे शहर पाणी पाणी केले 

माझ्यासाठी फक्त मीच असणार होतो 
मी स्वतःला दुर्मिळ गोष्टींच्या खाणी केले

श्रीधर तिळवे नाईक 
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)
=============================================================

खरे तर गोष्ट साफ आहे
फक्त आरसा गेला पळून आहे 
सत्तेच्या बुडाखाली बुडबुडे 
सर्वत्र पाणी मात्र गायब आहे
सत्तेने आहे  जो तो माजलेला ल्लक आहे
ते सभ्यतेने करप्शन करतात 
बाकीच्यांचा गुन्हा असभ्य आहे
आंधळ्यांच्या हाती डोळ्यांचे नेतृत्व 
काढलेली म्हणे दृष्ट आहे 
प्रत्येकाची मते विक्रीस लागलेली 
तिथेही चालू म्हणे सेल आहे 
खरे तर रिप्लेसमेंटची वेळ झाली 
प्लेस कुणास करावे हा प्रश्न आहे 
जिथे सगळ्यांच्याच हातात सुरे 
तिथे गांधींचे काय काम आहे 
म्हणा पुन्हा इंदिरा इज इंडिया 
कोणाला इंडिया माहित आहे 
प्रेत सर्व बाजूने खाल्ले गेले 
हाडावरती चालू भांडण आहे 
लोकशाहीस खांदा द्यायला निघालो 
आणि माझा खांदा निखळत आहे 
श्रीधर तिळवे नाईक 
(बाळबोध कविता ह्या काव्य  फायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना