PUROGAMIWAD
- Get link
- X
- Other Apps
000000000
उत्तर पुरोगामी वाद भारत आणि चायना श्रीधर तिळवे नाईक
चेन जीयान या चायनीज इतिहासकाराने लिहिलेले झू एन लाय यांच्यावरचे झूएनलाय अ लाईफ या नावाचे पुस्तक सध्या चर्चेला आलेले आहे या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला काही गोष्टी नव्याने बघाव्या लागतात चायनामध्ये नेमके काय घडले याचे विश्लेषण करणारी जी काही महत्त्वाची पुस्तके अलीकडे आलेली आहेत त्यात हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे यामध्ये असलेले माओचे चरित्र अत्यंत रक्तरंजित आहे याची कल्पना मला होती सुदेवाने याचे ठोस पुरावे ते दिसतात आणि त्यातून मग काही प्रश्न निर्माण होतात हे फक्त चायना मध्ये घडले की सर्वच देशात घडले असा प्रश्न निर्माण होतो आणि जर का यामध्ये इतिहासाचा एक बंध दिसत असेल तर तो कसा आकलनाच्या कक्षेत आणायचा असा प्रश्न निर्माण होतो
कुठल्याही राष्ट्राच्या इतिहासामध्ये पुरोगामी वाद आणि उत्तर पुरोगामी वाद हे विशिष्ट टप्प्यावर अवतरत असतात म्हणजे प्रथम धर्माला सुरुंग लावणारा पुरोगामी वाद येतो आणि मग त्या नवीन धर्मामुळे निर्माण झालेले जे नवीन स्ट्रक्चर असते जी नवीन राजेशाही असते त्या विरोधामध्ये राज्यक्रांती होऊन उत्तर पुरोगामी वाद अस्तित्वात येतो उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये पुरोगामी वादाची सुरुवात ही रॉजर बेकन फ्रान्सिस बेकन यांनी केलेली दिसते तर उत्तरपूरोगामीवादाची सुरुवात ही इंग्लंडच्या क्रांतीनंतर झालेली आहे फ्रान्समध्ये पुरोगामी वादाची सुरुवात ही माँटेग्यू न केलेली आहे तर उत्तर पुरोगामी वादाची सुरुवात ही फ्रेंच राज्यक्रांतीनंतर झालेली दिसते जिचा परिणाम संपूर्ण जगावर आहे उत्तर पुरोगामी वादाला राज्यक्रांती करणे आवश्यक का वाटते याचं कारण प्रस्थापित फिडलिस्टिक व्यवस्था पुरोगामी वाद पचवायला सुरुवात करून हळूहळू आपलीच राजेशाहीची सरंजामवादी विस्तारित चौकट प्रस्थापित करायला लागते आणि ती बदलायला तयार नसल्याने तिच्या विरोधात क्रांती करणे याशिवाय पर्याय उरत नाही आपल्याला हे इंग्लंड फ्रान्स मध्ये जसे घडलेले दिसते तसेच अमेरिकेत सुद्धा दिसते अमेरिकन राज्यक्रांती ही अमेरिकेमधल्या मधल्या पुरोगामी वादाची सुरुवात आहे तर तिथे सिविल वॉर ही उत्तर पुरोगामी वादाची सुरुवात दिसते जी क्रांतीच होती आणि जी लिंकन याच्या नेतृत्वाखाली झाली इथेही रक्तरंजित क्रांती झालेली दिसते कारण स्पष्ट आणि स्वच्छ युद्ध झालेले दिसते
भारतामध्ये पुरोगामी वादाची सुरुवात सर्व लोकांच्या पासून झाली आणि नवा लिंगायत धर्मआला याची सुरुवात बसवेश्वरांच्या पासून झाली पण नंतरच्या मुस्लिम आणि इंग्रजांच्या राजवटीमुळे त्यात खंड पडला परंतु पुन्हा एकदा १९ व्या शतकामध्ये राजा राम मोहन रॉय यांचा हिंदूवाद स्वामी दयानंद सरस्वती यांचा वैदिक वाद महात्मा फुले यांचा शैववाद आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा हिंदुत्ववाद उदयाला आले आणि पुरोगामी वादाला एक नवे वळण लाभले अमेरिकेप्रमाणे आपणाला इंग्रजांच्या राजवटी विरोधात लढून पुरोगामी वाद पुन्हा प्राप्त करणे गरजेचे बनले. थोडक्यात अमेरिकन राज्यक्रांती जशी झाली तशीच आपल्याकडे भारतीय स्वातंत्र्याची चळवळ झाली आणि त्यातूनच आपला पुरोगामी वाद आकार आला आला जो संविधानाच्या रुपाने आपल्यापुढे स्पष्ट झाला
आपण जर का यासंदर्भात चीनकडे पाहिले तर तिथेही हेच घडलेले दिसते तिथे कोमिटांग पक्षाने नंतर सनयत सेन यांनी पुरोगामी वादाचा पाया घातलेला दिसतो आणि नंतर माओ तसे तुंग यांच्या नेतृत्वाखाली तिथे उत्तर पुरोगामी वाद आलेला दिसतो त्यांनी घडवलेली राज्यक्रांती ही माओवादी राज्यक्रांती म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती रक्तरंजितच होती तिचे स्ट्रक्चर कसे हळूहळू फिडेलिस्टिक बनत गेले हे आपणाला या पुस्तकामुळे स्पष्ट होते डावा विचार असून सुद्धा शरण जामशाहीवादी बनणे हे कसे काय शक्य झाले मावस स्वतः राजाप्रमाणेच राजेशाही प्रमाणेच आपली सिस्टीम का चालवत होता हा एक फार मोठा प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने निर्माण होतो. पुढे हेच आपणाला अनेक कम्युनिस्ट राजवट यांच्यात घडलेले दिसते अगदी रशियात सुद्धा जोशी स्टैलीने हेच केलेले दिसते त्याचे जे काय स्ट्रक्चर आहे ते सरंजाम शाहीचे आहे आणि तिच्यावर राजेशाहीचा परिणाम आहे फक्त एकाधिकारशाही असा नवीन शब्द फार तर वापरता येईल पण बाकी ऑपरेटिंग सिस्टीम जुन्या काळातल्या राजे लोकांच्या प्रमाणेच दिसते हा उत्तर पुरोगामी वाद नेहमीच डाव्या चळवळीने जन्माला घातलेला आहे आणि तो क्रांती करतो आणि क्रांतिकारक राष्ट्रवाद निर्माण करतो अगदी आपण जर का अमेरिकेकडे पाहिले तर तिथेही हेच दिसते प्रथम अमेरिका नावाचे राष्ट्र निर्माण करणे आणि नंतर क्रांती होणे प्रश्न असाही निर्माण होतो की जगात सर्वत्र पुरोगामी वाद सरंजामवादी राजेशाही सारखा का आपली रचना तयार करतो? वास्तविक लोकशाहीचा प्रचंड डिंडोरा पिटत पुरोगामी वाद आलेला असतो तरीही हे असे का होते? की आधीचा सरंजाम वाद मोडीत काढणे पुरोगामी वादाला जमत नाही? की शासन संस्था पुरोगामी वादाच्या बाजूने उभे राहतात उभे राहतात पुरोगामी वादाला मदत करतात आणि त्यामुळे त्यांच्या राजवटी याच पुढे पुरोगामी वाद ताब्यात घेतात? म्हणजे आपल्याला असे म्हणता येईल का भारतातील पुरोगामी वाद हा भारतातल्या ब्रिटिश राजवटीने आपल्या ताब्यात घेतला होता आणि काही प्रमाणात तो इथल्या राजे लोकांच्या ताब्यात होता? असे तर नव्हते ना की नेहरू हे कळत नकळत ब्रिटिश राजेच होते? जिथे राजे नव्हते तिथे सहकाराच्या नावाने नवीन सरंजामदार पुरोगामी वादाने निर्माण केले का ? हे प्रश्न आता विचारणे गरजेचे आहे आजही आपली मानसिकता अशी तर नाही ? म्हणजे सरंजामवादी आणि म्हणूनच आपल्या निवडणुका सरंजामवादी पद्धतीने आजही चालवलेल्या आहेत? असे तर नाही ना की आपले सारे पुढारी स्वतःला राजे समजतात आणि जनतेकडून कर रूपाने घेतलेला पैसा जनतेला देताना जणू काही आपण महान कार्य करत असल्याचे प्रतिपादन करत असतात? स्वतःच्या खिशातून एकही पैसा न देता लोकांच्या खिशातून पैसे काढून तेच नंतर राजाने दान दिले राजाने मंदिर उभे केले अशा पद्धतीने उद्योग करणे यालाच राजेशाही म्हणतात राजे लोकांची अत्यंत कुटील अशी ही आर्थिक नीती जनतेला कधीच कळायची नाही पण ती आत्ताही कळू नये? हे सर्व उत्तर पुरोगामी वादी प्रकरण असेल तर मग आपल्याला आधुनिक तिकडे कसे सरकायला लागेल आपला निवडणुका आधुनिक कशा होतील? मुख्य म्हणजे हा उत्तर पुरोगामी वाद पुन्हा भारतीय जीवनात आला कसा?
प्रश्न असा आहे की भारतामध्ये पुरोगामी वाद तर सर्व बाजूंनी विकसित झाला मग उत्तर पुरोगामी वादांना क्रांती करणे का जमले नाही ?
भारतात हा प्रश्न प्रथम शेवटच्या संदर्भातच उपस्थित होतो. कारण फक्त शैवच असे होते ज्यांना पुरोगामी क्रांती जमलेली होती. त्यांच्याकडे बसवेश्वरांच्या सारखा महान विचारवंत निर्माण झाला होता आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या सारखे सर्वोत्तम म्हणावे अशा कॅटेगरीतले नेतृत्वही निर्माण झाले होते तरीही ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये सर्व लोकांना उत्तर पुरोगामी वादी क्रांती करणे का जमले नाही? ते कळत नकळत महात्मा फुले यांना संधी होते की नाही असा प्रश्न निर्माण होतो? की महात्मा फुले हे सामाजिक गोष्टीत इतके अडकून राहिले की त्यांना राज्यक्रांतीचे भानच राहिले नाही? महात्मा फुले यांच्या मर्यादा याच शैव धारेच्या मर्यादा ठरल्या का असा प्रश्न आता विचारायला हवा कारण तर्कानुसार गेलो तर क्षय व पुरोगामी वादानंतर फक्त क्षैब लोकांनाच उत्तर पुरोगामी क्रांती करणे शक्य होते असा प्रयत्न करत नकळत यशवंतराव होळकर यांनी केला होता परंतु दुर्दैवाने तो सफल झाला नाही त्यांचे पेशवाई विरोधातले बंड हे सरंजामशाही विरोधातले ही बंड होते त्यांना स्वतःच्या राज्यापुरता एक नवा राष्ट्रवाद निर्माण करता आला असता का एक फार मोठा प्रश्न आहे दिसते ते असे की स्वातंत्र्यानंतर सुद्धा महात्मा फुले यांच्या प्रभावामुळे ब्रिटिश राजवटी चांगलीच आहे असे गृहीत धरले गेले तिच्याविरोधात उत्तर पुरोगामी राज्यक्रांती करणे हे स्वप्नात सुद्धा शैव लोकांच्या आले नाही साहजिकच उत्तर पुरोगामी वादी क्रांती करण्याची जबाबदारी ज्या लोकांच्यावर होती त्या लोकांना त्यांचा माओ तुंग निर्माण करता आला नाही आणि चायना प्रमाणे भारतामध्ये क्रांती झाली नाही
या देशांमध्ये अशी दुसरी संधी डाव्या लोकांना विशेषतः कम्युनिस्टांना होती पण असे काय झाले की इथे डाव्या लोकांना अपयश आले ? वास्तविक सर्व पुरोगामी वादी लोक हे हळूहळू अपयशी होत जातात आणि त्यांच्या योजना फापलत जातात अशा वेळेला त्यातून नेहमीच डाव्या लोकांना संधी मिळालेली दिसते उदाहरणार्थ रशिया पण भारतात मात्र अशा प्रकारची संधी डाव्या लोकांना मिळालेली नाही क्रांती करण्याच्या सर्व शक्यता डाव्या लोकांच्या बाबतीत कायमच बारगळलेल्या का दिसतात अशा प्रकारचे क्रांति झाली असती तर भारत बदलला असता का? की उत्तर पुरोगामी वादाचे भारतीय प्रारूप तयार करण्यामध्ये कम्युनिस्ट लोक कमी पडले?
एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की चीनमध्ये माओने जे काही केले त्यामुळे चीनला एक भव्य राष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न पडले आणि माओच्या सर्व निगेटिव्ह बाजू बघून सुद्धा एक गोष्ट आपण कबूल केली पाहिजे ती म्हणजे त्याने चीनला एक राष्ट्र म्हणून उभे केले दुर्दैवाने त्याच्या क्रांतीमध्ये इतक्या वाईट गोष्टी होत्या आणि ती इतक्या लेव्हलला फेल गेली की त्या संदर्भात काही ना काही करणे गरजेचे बनले आणि शेवटी आधुनिक डावा विचार तिथल्या कम्युनिस्ट पक्षाने जन्माला घातला जो जवळजवळ कार्पोरेटवादी आहे फक्त ही कार्पोरेट चळवळ कम्युनिस्ट पक्षाने चालवल्यामुळे ती डावी वाटते भारतात डाव्या लोकांना मुळात कधी राज्य मिळाले नाही आणि जिथे हे राज्य मिळाले विशेषता बंगालमध्ये तिथे ज्या क्रांतिकारक सुधारणा घडणे आवश्यक होते त्या घडलेल्या दिसत नाहीत इतकी वर्ष सत्ता असूनही बंगाल मधल्या कम्युनिस्ट पक्षाला एक नवा बंगाल निर्माण करता येणे का अशक्य बनले याची चाचपणी करणे फार आवश्यक आहे त्या मानाने केरळामध्ये मात्र कम्युनिस्ट पक्षाला बऱ्यापैकी नवीन केरळ निर्माण करता आला तर त्याचे यश कुठे आहे तेही आपण पाहिले पाहिजे एका अर्थाने भारतातला उत्तर पूरोगामी वाद दिशाहीन झाल्यामुळे त्याला उत्तर पुरोगामी वादी क्रांती करता आली नाही असे म्हणता येते
हा उत्तर पुरोगामी वाद पूर्णपणे फेल गेल्यानेच मग एक पोकळी निर्माण झाली आणि हिंदुत्ववादाला उत्तर पुरोगामी वाद आणण्याची संधी मिळाली आणि मग उत्तर पुरोगामी वादात नेहमीच एक डिक्टेटर निर्माण होतो तशा प्रकारचे राजवट निर्माण होणे अटळ झाले आणि ही अटळता शेवटी नरेंद्र मोदी यांच्या साह्याने आता स्थिर झालेली दिसते एकाधिकारशाही हे उत्तर पुरोगामी वादाचे लक्षण आहे आणि अशाच प्रकारचा एखाधिकारवाद सुरुवातीला काही प्रमाणात इंदिरा गांधींनी सुरू केलेला होता आणि आता मोदींनी सुरू केलेला दिसतो प्रश्न असा आहे की या उत्तर पुरोगामी वादाला कितपत यश मिळाले आर्थिक पातळीवरच्या घडामोडी या खरोखरच यशस्वी झाल्या का माओने व स्टैलीनने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण केले त्याप्रमाणे शोषण मोदी करत आहेत का ? मुख्य म्हणजे एक संपूर्णपणे नवे राष्ट्र आणि नवा राष्ट्रवाद उभा करणे हे उत्तर पुरोगामी वादाला अत्यंत आवश्यक असते जिथे हे घडलेले नाही तिथे प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसतात उदाहरणार्थ सोवियत युनियन मध्ये आपणाला अनेक राष्ट्र एकसंध झालेली दिसतात आणि हळूहळू ती कधीतरी फुटणे अटळ होते त्याप्रमाणे ती फुटलेली आहेत पण आता फुटलेल्या राष्ट्रांमध्ये मात्र एक नवा राष्ट्रवाद संचाललेला दिसतो रशियावर सुद्धा एक नवा राष्ट्रवाद निर्माण करण्याची जबाबदारी आल्याने अत्यंत टोकाचा राष्ट्रवाद निर्माण करणे सुरू झालेले दिसते. प्रश्न असा आहे की हा उत्तर पुरोगामी वादाचा कायमच एकाधिकारशाहीकडे कल का जातो ? हे खरोखर आवश्यक असते का ? आणि मुख्य म्हणजे याने खरोखर राष्ट्र उभे राहणार आहे का? आपल्याकडे लोक फक्त पुरोगामीवादाची चर्चा करतात कारण आपल्याला फक्त त्याच संदर्भात यश मिळालेले दिसते अर्थात जगात कुठेही पुरोगामी वादाचा प्रोग्राम पूर्ण झालेला नाही परंतु माफक यश सर्वांनाच मिळालेले दिसते पण उत्तर पुरोगामीवादात मात्र भारत हा अपवाद का ठरला हा प्रश्न एकदा विचारणे आवश्यक आहे विशेषता ही जबाबदारी इंदिरा गांधींच्यावर होती आणि एकाधी कारशाही त्यांनी निर्माण पण केली होती परंतु त्या एकाधीकारशाहीला माओ ते ट्सुंग प्रमाणे यश का मिळाले नाही ? हा प्रश्न एकदा कधीतरी इतिहासाचा म्हणून विचारायला पाहिजे असे काय झाले की इंदिरा गांधी अपयशी झाल्या नंतर मग आपण राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली कार्पोरेट वादाकडे सरकलो कारण तोपर्यंत राजीव गांधींच्या काळात चायना काय करतो हे आपणाला कळून चुकले होते आणि आपण त्याच मार्गाने चाललोय ते अजूनही चालतो आहोत पण अनेकदा असे होते की इतिहासाची जी स्टेप मिसिंग झालेली असते ती स्टेप पुन्हा एखादा बेसावध वर्तमान काळ पकडून अवतरते उत्तर पुरोगामी वादाची जी स्टेप राहिली होती ती अचानक हिंदुत्ववादाच्या रूपाने कशी काय उदयाला आली ? असे काय झाले की राजीव गांधींच्या कार्पोरेट वादाकडून आपण आणखी पुढे सरकणे आवश्यक होते परंतु पुढे न सरकता आपण अचानक पुरोगामी वादाच्या दिशेने म्हणजे मागे आलो आपला राष्ट्रवाद खुळखुळा झाला होता त्यामुळे हे घडले का आणि जर का राष्ट्रवाद बलवान होता तर मग हे घडले कसे काँग्रेसच्या राष्ट्रवादीमध्ये असे काय मिसिंग होते की लोकांना दुसरा राष्ट्रवाद शोधावा लागला किंवा शोधावासा वाटला?
प्रश्न यापुढे आणखी एक येतो तो म्हणजे प्रमोद महाजन यांनी जो कार्पोरेट वाद मांडला होता तो हिंदुत्ववादी कॉर्पोरेट वाद होता त्याचाही परिणाम मोदी यांच्यावर झालेला दिसतो प्रश्न असा आहे की हा कार्पोरेट वाद अत्यंत व्यवस्थितपणे पुढे सरकणार आहे का कारण एकाच वेळेला कार्पोरेट वाद हिंदुत्ववादी राष्ट्रवाद आणि हिंदुत्ववाद एकत्रित सांभाळायचे हे गणित कसे काय जमणार आहे ? भारतातील ही एक ट्रांजेशनल पोझिशन म्हणून आपण स्वीकारली तरी सुद्धा प्रश्न कुठे सुटलेत?किंवा सुटतात? की अचानक आलेल्या इस्लामिक राष्ट्रवादामुळे आपण सुद्धा धार्मिक राष्ट्रवादी झालो ? एक गोष्ट नक्की आहे की काही प्रमाणात का होईना पण इस्लामचा झालेला हा साईड इफेक्ट आहे कारण जिथे जिथे इस्लाम होता तिथे इस्लामने राष्ट्र निर्माण करण्यासाठी इस्लामचा आदर्श ठेवला त्यांना असे वाटले की इस्लामच्या साह्याने धार्मिक राष्ट्रवाद उभा करून आपले राष्ट्र निर्माण करता येईल पण अनेकदा झाले असे की तुर्कस्तान सारख्या डेव्हलप झालेल्या देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारची इस्लामिक राजवट आली हे चक्क मागे जाणे होते मुख्य म्हणजे धर्माच्या आधारे उत्तरपुरोगामीवाद उभा करता येईल का असा प्रश्न आपण सर्वांनीच विचारायला हवा होता. या अंगाने काही असा झाली असती तर फार बरे झाले असते प्रत्यक्षात अशी काय मी मावसा झालेली नाही मुख्य म्हणजे आपण वारंवार इंग्लंड आणि युरोप आणि अमेरिका यांच्याकडे का बघतो आहोत आपल्याला खरे तर लक्ष द्यायला हवे ते चायनाकडे आपल्या आसपासच्या अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशाने श्रीलंकेकडे परंतु हे न करता आपला काहीतरी भलताच गोंधळ चाललेला दिसतो याचा एक दुष्परिणाम असा झाला की कळत नकळत हिंदुत्ववादाला ताकद मिळत गेले गेली
उत्तर पुरोगामी पुरोगामी वादाने धर्म पुन्हा परत आणला आणि याचे अनेक दुष्परिणाम राष्ट्रवादावर झालेले आहेत तरीसुद्धा लोकांना त्याविषयी आकर्षण का वाटते हे सुद्धा पाहिले पाहिजे मुख्य म्हणजे कळत न कळत इस्लाम बाबतीतली सगळी मांडणी विचारवंत विशेषता पुरोगामी विचारवंत नाकारत असले तरी प्रत्यक्षात मात्र लोकांना ती योग्य वाटते हिंदू लोकांना इस्लामचा फोगिया झालाय असे म्हटले म्हणून प्रश्न सुटणार आहे का त्याऐवजी हे भय का निर्माण झाले हा प्रश्न निर्माण करणे जास्त गरजेचे आहे जर का हा फोबिया नसता तर हिंदुत्ववाद निवडून तरी आला असता का असा प्रश्न मला नेहमी पडतो दुर्दैवाने त्यानंतर समान नागरी कायदा वगैरे गोष्टी काही भाजपने केल्या नाहीत आणि आता भाजप या गोष्टी करेल यावरचा भाजपवरचा विश्वास उडत चाललेला आहे किंबहुना ब्राह्मण्याने हिंदुत्व ताब्यात घेऊन पुन्हा एकदा या देशाचा सत्यनाश करण्याची तयारी चालवलेली आहे का असाच प्रश्न पडावा अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी जाता सुरू झालेल्या आहेत इतिहासाचा एक क्रम असतो इतिहास स्वतःच्या पद्धतीने उत्क्रांत होत असतो या उत्क्रांतीत पुरोगामी वादा नंतर उत्तर पूर्वगामी वाद हे पुरोगामी वाद हे योग्यच होते परंतु ज्या प्रकारची सरळ रेषीय सर रचना चायनाला लावली तशी संरचना आपल्याला का लाभली नाही आणि जर लाभली
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment