इस्लाम

इस्लाम

मागील लेखात आपण काही मुद्द्यांचा विचार केला आता इस्लाम संदर्भात आणखीन काही मुद्दे विचारात घ्यायचे आहेत त्यासाठी काही गोष्टी मुळात जाऊन समजून घ्याव्या लागतील मुख्य म्हणजे श्रद्धा म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय हे नीट तपासावे लागेल 


श्रद्धा म्हणजे कलेने केलेली काल्पनिक कारणमीमांसा आणि तिच्याद्वारे निर्माण केलेले काल्पनिक ज्ञान व काल्पनिक ज्ञानमीमांसा होय 


मनुष्य जेव्हा प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा मनुष्याच्या ठायी इंद्रिये होती आणि या इंद्रियांच्या सहाय्याने त्याच्या भोवतालचे जे जग होते त्याचे त्याला ज्ञान होत होते या जगाच्या पलीकडे काही असेल अशी त्याला शक्यता वाटत होती कारण तो आकाश पाहत होता आणि आकाशात आपल्यासारखेच काही अस्तित्वात आहे असे त्याला वाटत होते ते रात्री चमकत असल्याने तिथे प्रचंड प्रकाशा असावा असेही त्याला वाटत होते शिवाय तिथे चंद्र आणि सूर्य होते त्यामुळे ही शक्यता वाटत होती याशिवाय पाऊस देखील आकाशातूनच पडताना त्याला दिसत होता साहजिकच आकाश म्हणजे काहीतरी परलोका सारखे आहे आणि तिथे आपले पूर्वज राहतात अशा प्रकारची श्रद्धा निर्माण व्हायला लागली शिव्या सूर्य आणि चंद्र हे शास्ते आहेत अशी ही संकल्पना जन्माला लागली साहजिकच इंद्रियांच्या द्वारे होणारे आणि येणारे अनुभव ज्यात हे आकाशानुभव पण प्रचंड होते त्याच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी होते. प्रश्न असा होता की हे सर्व अनुभव साठवायचे कसे आणि पुढच्या पिढीला द्यायचे कसे या काळामध्ये शिकारीचा शोध लागलेला होता आणि साहजिक शिकारी विषयक आणि इतरत्र हाताला लागलेली घर बांधण्याची वगैरे सूत्रे पुढच्या पिढीला कशी द्यायची हा प्रश्न होता. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि एकमेकाला ह्या गोष्टी पोहोचवण्यासाठी त्याने सुरुवातीला आदिम भाषा निर्माण केली जी शब्द कमी आणि खाणाखुणा जास्त होती त्यातूनच भाषेचा शोध लागला आणि कला जन्मली त्याचबरोबर कौशल्य केंद्रस्थानी असलेली कुशलकला जन्मली कलेद्वारे माणसाने अनुभवाचे जतन केले आणि कुशलकलाद्वारे कौशल्याचे जतन केले शहाणपणाचे जतन केले साहजिकच कला सुद्धा अनेकदा शहाणपण सांगत असे आणि आजही कलेचा हा गुणधर्म गेलेला नाही 


या कलेबरोबरच माणसाचं एक काम वाढत गेले एक अंग वाढत गेले ते म्हणजे पशु व्यवसाय ! त्यामुळे पशुपालन करणारी टोळी मोठी होऊ लागली स्थिरता येऊ लागली आणि टोळीसाठी नियम तयार करणे गरजेचे बनले. जोपर्यंत टोळी छोटी होती तोपर्यंत मौखिक नियम चालत होते परंतु हळूहळू टोळी मोठी होत गेली तसे लिखित नियम गरजेचे झाले आणि त्यातूनच धर्माचा जन्म झाला धर्म ही माणसाची पहिली राज्य प्रणाली आहे जी राज्य कोणी करायची करायची समाजाने कोणते नियम धारण करायचे कसे आणि कोणत्या नियमानुसार राज्य चालवायचे आणि राज्याचे कायदे काय असावेत त्याची नीतिमत्ता काय असावी याविषयी मार्गदर्शन करत होती साहजिकच श्रद्धेचे कलाद्वारे करण्यात आलेले राजकीय रूपांतर म्हणजे धर्म होय धर्माचे हे मूळ स्वरूप एकदा लक्षात आले की मग आपल्याला आत्ताच्या जगात काय चालले आहे ते कळते प्रत्येक टोळीजवळ तिचा धर्म होता परंतु हळूहळू टोळ्यांच्या मध्ये युद्ध सुरू झाली आणि या सर्व टोळ्यांना मिळून जी टोळी जिंकत होती तिचा धर्म कळत नकळत लादला गेला आणि त्यातूनच महाधर्माचा उदय झाला ज्याला आजकाल आपण रिलीजन किंवा मजहब म्हणतो यासंदर्भामध्ये इस्लामचा इतिहास पाहणे हे नेहमीच फायद्याचे ठरते कारण टोळ्या कशा भांडत होत्या हे इस्लामच्या इतिहासामध्ये जास्त स्पष्ट होत जाते मुळातच भवतालच्या जगाचे जे भय होते त्या भयातून माणसाने मांत्रिकी तयार करायला सुरुवात केली होती आणि या मांत्रिकीला श्रद्धेचा आधार होता. धर्माने ही मांत्रिकी संपूर्णपणे नाकारली नाही मात्र लिखित स्वरूपातील मंत्र हे अधिक ऑथेंटिक मानायला सुरुवात केली साहजिकच मांत्रिकी गेली नाही आणि धर्मामध्ये मांत्रिकी सळसळली मात्र आता ही मांत्रिकी धर्मग्रंथाच्या आधारे उभी राहिली मांत्रिकीमध्ये मंत्र प्रमाण मानले जातात आता धर्मग्रंथ प्रमाण मानले जाऊ लागले


थोडक्यात काय अनुभवाच्या आधारे श्रद्धेच्या साह्याने कलांच्याद्वारे कलेतील कल्पनांच्याद्वारे निर्माण झालेली राज्य प्रणाली म्हणजे महाधर्म होय रिलिजन होय मजहब होय


धर्माचे हे मूल स्वरूप लक्षात न घेतल्यानेच अलीकडे प्रचंड गोंधळ झालेला दिसतो धर्म हा निश्चितपणे स्वतःला परलोकाशी जोडतो पण प्रत्यक्षात त्याला या इहलोकांवर संपूर्ण ताबा ठेवायचा असतो किंबहुना प्रस्थापित लोक ज्यांच्या हातात या इहलोकांची सत्ता असते ते अत्यंत जाणीवपूर्वक शहाणपणाचा कैवार घेत निर्माण झालेला शहाणा आपल्या ताब्यात घेत त्याला ओळखवत त्याच्या आयुष्याच्या आधारे धर्मग्रंथ निर्माण करत आणि त्याचा उपदेश बळकावत धर्म निर्माण करतात आणि तो आपल्या ताब्यात ठेवतात


इस्लाम याला अपवाद नाही जगामध्ये चार जमाती या अत्यंत आक्रमक आहेत 

पहिली ब्राह्मण दुसरी ज्यू तिसरी ख्रिश्चन आणि चौथी इस्लाम या फक्त धर्म नाहीत तर या जमाती आहेत ज्या सर्व जगाला आपल्या पद्धतीने नियंत्रित ठेवू इच्छितात साहजिकच प्रत्येक समाजामध्ये जिथे त्या जातील तिथे आक्रमक होत आपले स्थान घट्ट करायचा प्रयत्न करत असतात स्वतःला बलवान करायचा प्रयत्न करत असतात ज्यू अल्पसंख्यांक असूनसुद्धा आणि ब्राह्मण अल्पसंख्यांक असूनसुद्धा त्यांनी कधीही गिव्हप केलेले नाही ते लढत राहतात याचे कारण आपण काहीतरी दैवी आहोत असा त्यांनी करून घेतलेला समज जो त्यांना श्रद्धेतून प्राप्त झालेला आहे ज्यू आणि ब्राह्मण दोघेही स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात यांच्यानंतर ख्रिश्चन आणि इस्लाम यांचा क्रमांक लागतो एकेकाळी ख्रिश्चनसुद्धा जमातीवादीच होते आणि आपली जमात कशी वाढवता येईल तेच पाहत होते पण हळूहळू तंत्रवैज्ञानिक क्रांतीनंतर त्यांचे धर्मवेड आणि धर्म वाढवणे कमी झाले मात्र बंद झालेले नाही याउलट इस्लाम हा मात्र अजूनही जमाती असून स्वतःची धार्मिक जमात वाढवण्याबाबत प्रचंड कट्टर आहे सगळा शहाणपणा जो काय आहे तो आपल्याकडे आहे असा त्यांचा ठाम आग्रह आहे आणि आपल्यावर विशेषतः देवकृपा आहे असेही त्यांना वाटते या सगळ्याला बळ दिलेले आहे ते त्यांच्या वाढत्या लोकसंख्येने आणि नंतर तर अशी अवस्था आली आहे की लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लक्ष गेल्यानंतर बाकीचे धर्म जसे सावध झाले तसा इस्लाम सावध झाला नाही उलट इस्लाममध्ये गोष्टी इतक्या थराला गेलेत की तिथे लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्नच उद्भवत नाही अशा तऱ्हेने वागणे उद्भवले . ख्रिश्चन लोकांच्या सुद्धा ब्रह्मचर्य आले परंतु इस्लामने कधीही ब्रह्मचर्य स्वीकारले नाही कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाने मूल जन्माला घातलेच पाहिजे अशी इस्लाम मध्ये सक्ती आहे ब्रह्मचारी मनुष्य इस्लामला मान्य नाही इतकेच कशाला दत्तक घेणे सुद्धा इस्लामला मान्य नाही प्रत्येक माणसाने स्वतःच्या मुलांना जन्म दिला पाहिजे असे इस्लाम मानतो त्याशिवाय स्वर्ग मिळत नाही असे मानतो साहजिकच स्वर्ग मिळवण्यासाठी का होईना इस्लाम मुलांना जन्म देत राहतो इस्लाम मधल्या राजवंशाच्या ज्या लढाया झालेल्या आहेत त्यामध्ये दत्तक घेता न येणे या गोष्टीचा सुद्धा प्रचंड वाटा आहे अन्यथा मूल झाले नाही तर दत्तक मूल घेऊन वारसा हक्काचा प्रश्न सोडवता आला असता 


जोवर हिंदुस्थानामध्ये हिंदू लोकांना अनेक बायका करण्याची परमिशन होती तोपर्यंत इस्लाम मधला चार लग्नाचा प्रश्न किंवा लोकसंख्या वाढ हा नॉर्मल प्रकार वाटत होता कारण साधारणपणे दहा टक्के लोकच अधिक लग्न करत असतात इस्लाम अपवाद नव्हता आणि नाही परंतु पुढे पुढे दुसऱ्या धर्मातल्या बायका करून आणल्या तर त्या पोसता याव्यात अशी सक्ती नव्हती शिवाय इस्लामला गुलामगिरी मान्य असल्यामुळे अनेकदा युद्धात दास बनवलेल्या बायकांना कापण्यापेक्षा त्यांना गुलाम बनवून त्यांच्याद्वारे पुन्हा अपत्य निर्मिती करणे हे इस्लाम मध्ये कायदेशीर मानले जात होते धार्मिक मानले जात होते या सगळ्याचा एक परिणाम असा आहे की लोकसंख्या ही इस्लाम कायमच असेट मानत असतो आणि ह्याच विचाराचा प्रभाव १८५० नंतर पडल्याने इस्लामची लोकसंख्या वाढतच राहिली पुढे पुढे तर कुठल्याही राष्ट्रांमध्ये इस्लाम आणायचा असेल तर तिथे आपली लोकसंख्या वाढतीच ठेवली पाहिजे असे एक समीकरण रूढ झाले साहजिकच अत्यंत जाणीवपूर्वक लोकसंख्या वाढवणे हे चालूच राहिले आहे आणि ते थांबण्याचे कसलेही लक्षण दिसत नाही 


इस्लामची एक परंपरा श्रद्धा अशी आहे की त्यांचा प्रॉफेट शेवटचा आहे त्यामुळे त्याने दिलेला मेसेज हाही शेवटचा आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हेच प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे साहजिकच राज्य ही संस्था प्रचार आणि प्रसार संस्था आहे धर्म संस्था आणि राज्य संस्था अशा दोन्ही संस्था जेव्हा धर्माचा प्रचार करतात तेव्हा त्याला एक संघटीत रूप प्राप्त होते आणि नेमके हेच इस्लामला फायद्याचे ठरलेले आहे यातच युरोपला नेमके एक अवदसा आठवली ती म्हणजे अल्पसंख्यांकांच्या हक्काचे रक्षण ! हा कायदा करताना त्यातून इस्लामला वगळणे फार आवश्यक होते पण हा विवेक तिथल्या पुरोगामी लोकांच्याकडे नसल्याने आदिवासी लोकांना द्यायचा न्याय यांनी इस्लामला लावला हा एक असा कायदा होता ज्याचा फायदा फक्त इस्लामला झाला मुळात ज्यू लॉबीने स्वतःसाठी आणलेले हे प्रकरण आहे पण प्रत्यक्षात त्याचा फायदा यहुदी लोकांना कमी आणि इस्लामला जास्त झाला जिथे जाईल तिथे अल्पसंख्यांक असण्याचा फायदा उठवत स्वतःची लोकसंख्या वाढवत ठेवणे हे इस्लामने केलेले दिसते 


यावर उपाय एकच आहे ज्याची सुरुवात आता युरोपियन कंट्री मध्ये व्हायला लागलेली आहे आपण केलेली चूक दुरुस्त करण्याशिवाय पर्याय नाही याचे भान हळूहळू तिथे उदयाला येताना दिसते हे भान म्हणजे गैर इस्लामीक कायदे सर्व मुसलमानांच्या वर लादणे मुस्लिम लोकसंख्या कायदे स्वीकारतील हा फार मोठा भ्रम आहे अनेकांना उगाचच कारण नसताना मुसलमानांच्या बाबतीत हृदय परिवर्तन आठवत असते महात्मा गांधीना जिथे स्वतःच्या मुलाला सुद्धा थांबवता आले नाही तिथे संपूर्ण कम्युनिटी चे काय रक्षण होणार आणि काय हृदय परिवर्तन होणार ? हा एक फालतूचा आशावादी रोमँटिसीजम आहे आणि पुरोगामी लोकांनी तो जास्तीत जास्त प्रचलित केलेला आहे प्रत्यक्षात इस्लाम याबाबतीत ऐकणे शक्य नाही नेमकी याच वेळेला सर्वत्र आलेली लोकशाही व्यवस्था ही इस्लामला फायद्याची ठरलेली आहे म्हणजेच जगाने उन्नती करावी आणि इस्लामला त्याचा फायदा स्वतःच्या धर्मप्रचारासाठी आणि प्रसारासाठी व्हावा असा हा विरोधाभास आहे आणि हा आडवांटेज देणारे अति शहाणे सतत उदारमतवादामध्ये जन्मलेले आहेत आपण काय करतोय याची या लोकांना कधीही कल्पना आली नाही बघता बघता आता तुर्कस्तान सुद्धा इस्लामिक राज्य झाला पण तरीही यांची अक्कल काही ताळ्यावर येत नाही यांना कुठून हा आशावाद वाटतो मला माहित नाही म्हणजे या संदर्भात काही पुरावे तरी द्या एरव्ही पुरावे मागत हिंडणारे विज्ञाननिष्ठ लोक पुरोगामी लोक याबाबतीत मात्र कसलाही पुरावा देत नाही काही वैयक्तिक हळवी उदाहरणे देतात पण उदाहरणे म्हणजे नियम नसतो तुमच्या समोर केमाल पाशाने केलेली क्रांती बघता बघता इस्लामिक राज्यात कन्व्हर्ट झाली आणि तरीसुद्धा तुम्हाला जर का अक्कल येत नसेल तर त्याचा अर्थ इतकाच आहे की तुम्ही एक तर भोळसट आहात किंवा स्वतःच्या धर्माचे शत्रू आहात तुम्हाला स्वतःचा धर्म म्हणजे इस्लामपुढे किस झाड की पत्ती वाटतो आणि तो बोंबलत गेला तरी चालेल असे तुम्हाला वाटते वैयक्तिक पातळीवरचे गोड गोड अनुभव मला सुद्धा येतात किंबहुना माझे दोन व्यवसायिक पार्टनर मुसलमान होते पण ते एखाद्या धर्माच्या विश्लेषणासंदर्भात उपयोगी पडत नाहीत त्यासाठी त्या धर्मात काय सांगितले गेले आहे तेच पाहावे लागते इस्लाम हा काही या चांगल्या लोकांच्या ताब्यात नाही तो त्यांच्या कुवती बाहेर आहे आणि त्याला जे करायचे तेच तो करणार आहे शिवाय माणूस संघटित होताना अति धार्मिक होतो असा इतिहासाचा दाखला आहे


यावर उपाय एकच होता समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण! पंडित नेहरूंनी या जर का दोन गोष्टी केल्या असत्या तर ते फार मोठे ठरले असते पण दुर्दैवाने हे त्यांनी केले नाही आणि आज संपूर्ण देशाला त्याची किंमत मोजावी लागते आहे हिंदुत्ववादाच्या विजयाला कळत नकळत नेहरू यांच्या या अपयशाचा हातभार लागलेला आहे याच मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपकडून या संदर्भात प्रचंड अपेक्षा होत्या पण भाजपने त्या धुळीस मिळवलेल्या आहेत याचे कारण इस्लाम कसा वाढतो यापेक्षा वैष्णव धर्म कसा वाढेल सनातन धर्म कसा वाढेल यावरच भाजपचे सध्या जास्त लक्ष आहे इस्लाम विरोध ही एक मत मिळवण्यासाठी निर्माण केलेली स्ट्रॅटेजी आहे असेच आता म्हणावे लागते आता ही स्ट्रॅटेजी आम्हाला मान्य नाही हे सांगण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच या इलेक्शन मध्ये भाजपच्या विरोधात मतदान व्हावे त्याशिवाय भाजपाला अक्कल येणार नाही समान नागरी कायदा करा लोकसंख्या नियंत्रण कायदे करा आणि मगच आमची मते मिळवा असे आता ठामपणे सांगणे आवश्यक आहे या संदर्भातल्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या तुम्ही निर्माण केलेल्या अडचणी आहेत आणि फक्त वेळकाढूपणा तुम्हाला करायचा आहे म्हणून तुम्ही हे करत आहात हिंदुत्वाचे नाव घेतले म्हणून कोणी हिंदू धर्मरक्षक होत नाही प्रत्यक्षात त्यासाठी आतूनच पॅशन असावी लागते अशा प्रकारची कसलीही पॅशन वैष्णव धर्मात नव्हती केवळ स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी इस्लाम विरोध ही एक खेळी आहे मुस्लिमांच्या मतासाठी धर्मनिरपेक्ष असणारी काँग्रेस आणि हिंदूंच्या मतासाठी इस्लाम विरोधक असणारे हिंदुत्ववादी यांच्यात काही फरक उरलेला नाही 


ज्यांना धर्माचे रक्षण करायचे असते ते सत्तेकडे बघत नाहीत ते फक्त धर्माकडे बघतात हिंदुत्ववादी असे आहेत असा समज झाला होता प्रत्यक्षामध्ये ते असे निघाले नाहीत हे या देशातल्या वैष्णव आणि शैव लोकांचे दुर्दैव आहे आता फक्त ब्राह्मण लोकांना ब्राह्मण धर्म हा स्वतंत्र धर्म आहे ही मान्यता देऊन टाकली की यांचे कार्य पूर्ण झाले या सगळ्याला उपाय एकच आहे कोणीतरी शिवाजी महाराज जन्मला पाहिजे ज्याला इस्लाम बद्दल प्रेम पण असेल पण त्याच्या विस्ताराला कसा आळा घालायचा तेही कळलेले असेल यासाठी सध्या तरी शैव लोकांनी जागृत होणे आवश्यक आहे


तिसरा उपाय अर्थातच धर्मप्रसार असतो पण या संदर्भात काय दिसते साधे उदाहरण घ्या वास्तविक मुस्लिम स्त्रिया जितक्या तुमच्या धर्मात आणता येतील तितक्या तुम्ही आणायला हव्यात पण तुम्ही काय केले तर बाजीरावाच्या मस्तानी बरोबरच्या लग्नाला विरोध आता आशाने तुमचा धर्म कसा काय वाढणार? तुमच्या धर्मात फक्त जायची अनुमती आहे यायची अनुमती नाही असे फालतू आणि नीच तर्कशास्त्र देणारे लोक धर्मप्रचाराचे काय काम करणार? उलट धर्मप्रचाराचे काम आपल्या अंगावर येऊ नये म्हणून या आळशी लोकांनी आमच्यात कोणाला आत घेत नाही असे सांगितले कारण धर्मप्रचार करायचा तर जीवावर रिस्क घ्यायला लागतील ती कशाला हे लोक घेतील? मुसलमान लोकांच्यात जाऊन धर्म प्रचार करण्याची हिम्मत आहे? नुसती घर वापसी बोलून काय फायदा? हे लोक अमेरिकेसारख्या अनेक इंग्लंड सारख्या सुरक्षित देशात जाऊन धर्मप्रचार करणार मुस्लिम देशात जाऊन धर्म प्रचार करण्याची हिम्मत आहे? इस्लामचे जे सर्वात उत्तम तत्व सांगितले जाते ते म्हणजे समता तर बाकी जाऊ द्या आपण तुमची वर्ण आणि जात व्यवस्था नष्ट करायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला ब्राह्मण म्हणून गेले बंद करावे लागेल ते करायची तयारी आहे स्वतः ब्राह्मण महासंघ काढायचे आणि हिंदू वाढवा म्हणून सांगायचे आधी स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला शिका तुमच्या सर्टिफिकेट वर फक्त हिंदू एवढा शब्द दिसू द्या जात आणि वर्ण लिहूच नका बघूया वर्ण आणि जातीचा त्याग एवढा तरी करता येतो का आणि जर या गोष्टींचा त्या करता येत नसेल तर तुम्ही इस्लामपुढे काय टिकणार ? साध्या अस्पृश्यता समूळ नष्ट करणे आवश्यक होते पण ते सुद्धा करता आलेले नाही समरसता सांगून काय फायदा मुळात काही गोष्टी नष्टच करायला पाहिजे थोडक्यात म्हणजे धर्मासाठी वर्ण आणि जातींचा त्याग केलाच पाहिजे असा आग्रह तुमच्या कृतीतून प्रथम दिसला पाहिजे जर तोच दिसत नसेल तर बाकीची जनता काय तशी होणार ब्राह्मण आणि क्षत्रिय हे या देशातल्या अनेकांचे आदर्श असतात ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्ण जाती पाळतात म्हणून बाकीचे लोक पण पाहतात तर प्रथम या दोन वर्णांनी वर्ण नि जात दोन्हींचा त्याग करावा तरच इस्लामच्या विरोधासाठी तुम्ही समतेचे तत्व घेऊन ठामपणे उभे राहू शकता सर्वात प्रथम ब्राह्मणांना आपला वर्ण आणि जात शाळेच्या दाखल्यात लिहिता येणार नाही असा कायदा पास करा मग पुढच्या गप्पा बघू


वस्तुस्थिती अशी आहे की सर्व भारतीय धर्मात असणारी भोके आता भारतीय धर्मांना महागात पडत आहे विशेषतः इस्लामच्या संदर्भात तर ती प्रचंड मोठी झालेली आहेत अनेकांना तात्कालीकच विचार करायचा असल्याने ते तात्कालिकच दाखवत बसतात भविष्यात काय वाढून ठेवले याची या लोकांना चिंता नाही त्यांना असे वाटते की हा इस्लामफोबिया आहे प्रत्यक्षामध्ये तो वस्तुस्थितीच्या आधारे निर्माण झालेल्या भयाचा अविष्कार आहे हे भय आतमध्ये नाही पण समाजाच्या संदर्भात आहे इतिहासामध्ये काय झाले याच्या भाना मधून आलेले आहे कारण इस्लाम सर्वत्र पसरला तर मोक्ष नाहीसा होणे अटळ आहे कारण इस्लाम मध्ये मोक्षाची संकल्पना नाही ख्रिश्चन लोकांच्यात निदान आता बदल झाल्याने ती स्वीकारली जात आहे ज्यूलोक सुद्धा त्या मार्गावर आहेत परंतु इस्लाम मात्र कधीही ही गोष्ट स्वीकारणे शक्य नाही कारण ती प्रेषिताने सांगितलेली नाही कुराणांमध्ये मोक्ष नाही इस्लाम अपरिवर्तनीय असल्यामुळे काही बदल होण्याचीसुद्धा शक्यता नाही जे बदल होतील ते वरवरचे आहेत


इस्लामला सध्या गाजा पट्टीत ज्यू लोकांनी टक्कर दिल्यामुळे अनेकांना आनंद होतो पण स्पष्ट सांगायचे तर इस्त्राईल पुरते असलेले हे तात्कालीक सोल्युशन आहे जगभरच्या इस्लामला तो आक्रमक झाला तर कसे तोंड द्यायचे याविषयीची कसलीही पॉलिसी कोणाकडेही नाहीये माझी यासंदर्भातले म्हणणे असे की निदान समान नागरी कायदा लागू करावा आणि सक्तीचे लोकसंख्या नियंत्रण आणावे हा एकच मार्ग इस्लामला नियंत्रणात ठेवू शकतो अन्यथा इस्लामची वाढ अटळ आहे आणि २०८० यावर्षी ९०% जग इस्लामच्या दिशेने जाऊन इस्लाममय झालेले असेल मला अनेक पुरोगामी मित्र सांगतात की हे सगळे तू बोलतोस आणि स्वतःच्या पायावर स्वतःच्या करिअरच्या पायावर धोंडा पाडून घेतोस तुला त्यामुळेच कोणीही आत घेत नाही मला याची कल्पना आहे एकाच वेळेला ब्राह्मण धर्म आणि मुस्लिम धर्म यांच्या विरोधात तुम्ही उभे टाकलात की या देशांमध्ये तुम्हाला कुठेही जागा भेटत नाही याची मला नीट कल्पना आहे पण माझ्याच एका कथेत मी माझा होऊ घातलेला मृत्यू सांगितलेला आहे तसा तो झाला तरी मी तो स्वीकारलेलाच आहे असे होऊ शकते याची मला नीट कल्पना आहे त्यामुळे माझी काळजी करण्यापेक्षा मोक्षाची काळजी करा ते जास्त गरजेचे आहे


वस्तुस्थिती अशी आहे की मला मुस्लिम लोकांच्या बद्दल प्रचंड करुणा आहे कारण शेवटी ते होमोसेपियन्स आहेत आणि सर्वच होमोसोपिअन्सचे भले झाले पाहिजे असे मला वाटते इस्लाम मुळे हे भले होते असे मला वाटत नाही ब्राह्मण धर्मामुळे हे भले होते असे मला वाटत नाही बाकीच्या धर्मांच्यात मात्र परिवर्तनाच्या शक्यता प्रचंड असतात म्हणून मी त्यांच्यावर कडक टीका करत नाही अनेकांना अलीकडे एका इतिहासदत्त सत्याचा विसर पडलेला आहे ते सत्य म्हणजे जगातल्या बहुतांशी चांगल्या सभ्यता या रानटी टोळ्यांनी नष्ट केलेल्या आहेत हे जग ९० टक्के इस्लामधर्मि ज्या दिवशी होईल त्या दिवशी या पृथ्वीवरचे वैज्ञानिक कल्चर सायंटिफिक कल्चर टेक्नॉलॉजिकल कल्चर नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागेल अनेकांना हे पटणार नाही पण भविष्यात हे हळूहळू स्पष्ट होत जाईल आणि हे मी इस्लामफोबियापोटी सांगत नाही मला इस्लामचा फोबिया नाही इस्लामवर मी अनेक चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत परंतु समाजाचा विचार करताना वैज्ञानिक प्रत्यक्ष पुराव्याच्या शक्यता चाचपत गोष्टी बघाव्या लागतात जर इस्लाम बदलला तर त्याहून आनंदाची गोष्ट दुसरी नाही किंबहुना इस्लाम बदलावा म्हणूनच माझा प्रयत्न चाललेला असतो एवढी मोठी लोकसंख्या जर काय विज्ञानाला प्रमाण मानून मोक्षाला स्वीकारून वाटचाल करेल तर या जगामध्ये प्रचंड फरक पडेल माझी आशा संपलेली नाही पण भविष्य विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून जे भविष्य मला दिसते ते कठोरपणाने मी मांडत असतो त्याचा मुख्य उद्देश वॉर्निंग देणे हा आहे ज्यांना ती समजते त्यांनी ती घ्यावी ज्यांना ती समजत नाही त्यांनी याला इस्लामफोबिया समजून दुर्लक्ष करावे काळच मी बरोबर की चूक हे ठरवेल


श्रीधर तिळवे नाईक


तिसरे महायुद्ध दारात आले आहे का श्रीधर तिळवे नाईक 

इस्लाम आणि इस्लामेतर हा धर्म संघर्ष इस्लाम जन्मल्यापासून सुरू आहे तो कधी थांबण्याची शक्यता ही नाही कारण इस्लामचे अंतर्गत रचनाच तशी आहे ते बदलण्यासाठी नवीन प्रॉफेट ची शक्यता असावी लागते ती शक्यता ही मोहम्मद पैगंबर यांना अंतिम प्रेषित मानल्याने शक्य होत नाही त्यामुळे ही एक बंद झालेली वाट आहे आणि आश्चर्यकारकरीत्या या बंद असणाऱ्या किल्ल्यामध्ये संपूर्ण जग प्रवेश करत आहे ज्यांना ज्यांना पुरोगामी वाद आणि आधुनिक वाद झेपत नाही असे सारे लोक मागच्या दाराने इस्लाममध्ये घुसत असतात त्यामुळे इस्लामिक लोकांची संख्या वाढते आहे हा संघर्ष अस्तित्वात नाही अशी कल्पना करून काही लोक वाळूत डोके खूपसून बसलेले आहेत ही सुद्धा एक टिपिकल हिंदू प्रवृत्ती आहे परिणाम इतकाच झालाय की हिंदू लोकांच्या हातातून त्यांचा ७०% भूभाग हळूहळू निघून गेलेला आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याबद्दलही काही वाटणे आता उरलेले नाही हिंदूंना बधिर करण्यामध्ये सर्वाधिक वाटा हा ब्राह्मण्याचा आहे ब्राह्मण धर्माने स्वतः संवेदनशीलता गमावलीच पण त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर सर्व हिंदवी धर्मांना संवेदनशीलता गमवणे भाग पाडले आता हा धर्म संघर्ष स्पष्ट आणि स्वच्छ पणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर अवतरलेला दिसतो आणि त्यातूनच इस्त्राईल आणि इराण यांच्यात आता युद्ध सुरू सुरू झालेले दिसते . इस्लामचा गैरइस्लामवाद इस्रायलला व्यवस्थित कळलेला आहे पण त्यांचे संरक्षणाचे धोरण हे "आक्रमण हे संरक्षण "असे असल्याने एक प्रकारचा जाज्वल आणि अतिरेकी आक्रमकपणा जो अनेकदा आगाऊपणा वाटतो ते दाखवत असतात इथेही हेच घडलेले आहे इराण ह्या देशाने अणुबॉम्ब तयार केला तर तो निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या तरी इस्लामेतर देशावरच टाकला जाणार हे उघड आहे आणि या अणुबॉम्बची दिशा इस्त्राईलच असणार असे इस्त्रायलला वाटते हा अणुबाँब आमच्यावर पडण्याआधीच आम्ही इराणचा बंदोबस्त करतो जेणेकरून ते अणुबाँब तयार करू शकणार नाहीत अशी "आक्रमण हे संरक्षण" या धोरणातून अवलंबलेली पद्धत पुन्हा अवलंबलेली आहे परिणाम इस्त्रायलचा हल्ला!


जोपर्यंत ट्रम्प शुद्धीवर होते तोपर्यंत इस्त्राईल आणि अमेरिका या युतीमुळे पावर ऑफ बॅलन्स टिकला होता पण ट्रम्प हा एक अती शहाणा माणूस आहे त्याने मुस्लिम राष्ट्रांना प्रोत्साहन दिले आणि हा समतोल बिघडवला जी मुस्लिम राष्ट्रे अमेरिकेच्या दबावामुळे इस्त्राईलच्या विरोधात जात नव्हती ती आता प्रथमच इस्त्राईलच्या विरोधात जाताना दिसतात कारण अमेरिका आपल्या विरोधात काही करणार नाही कारण अमेरिकेचे आर्थिक संबंध आपल्या देशात गुंतलेले आहेत याची त्यांना पूर्णपणे आता कल्पना आलेली आहे आणि ट्रम्प यांना इस्त्राईलच्या संदर्भात आपण फाट्यावर मारू शकतो याची खात्री त्यांना पटलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा इस्त्राईल विरोधात मुस्लिम राष्ट्र असा संघर्ष निर्माण झाला आणि त्यातून एक मोठे खंड युद्ध तयार झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही हे खंड युद्ध महायुद्धात पर्यंत पोहोचेल की नाही याची कल्पना करणे सध्यातरी शक्य नाही पण जर का मुस्लिम देश इस्त्राईल विरोधात संघटित झाले आणि हे संघटन जागतिक झाले तर मात्र तिसरे महायुद्ध इस्लाम विरुद्ध इस्लामेतर होऊ शकते पाकिस्तान इस्रायल विरोधात भूमिका घेणारच घेणार कारण त्याला मुस्लिम राष्ट्रांची मदत आवश्यक वाटते त्यामुळे भारताला पेचातही पकडता येते भारताला कोणाचीही बाजू घेणे संकटातच टाकणारे आहे जर का भारत इस्राईलच्या बाजूने आला आणि पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध पुकारले तर किमान इराण हे राष्ट्र भारताच्या विरोधात जाणार हे 100% खरे आहे इराणच्या मागोमाग किती मुस्लिम राष्ट्रे जातील हा खरा प्रश्न आहे अफगाणिस्तान आत्ता आपला मित्र असला तरी इस्त्राईलच्या प्रश्नावर तो आपल्या बाजूने येणे शक्य नाही त्यामुळे त्याने तटस्थ अलिप्त भूमिका स्वीकारली तर आश्चर्य वाटणार नाही 


सद्दाम हुसेन विरोधात केवळ आण्विक शस्त्रास्त्रे हाच मुद्दा अमेरिकेने आणला होता हाच मुद्दा इस्त्राईलने आला आणला तर मात्र ते चुकीचे असे म्हणता येईल का हा फार मोठा प्रश्न आहे इस्त्राईलची गुप्तचर यंत्रणा ही जगातली सर्वोत्तम यंत्रणा आहे आणि त्यांच्याकडे नक्कीच या संदर्भात काही ना काही माहिती आलेली असणार त्यातूनच आलेल्या असुरक्षिततेपोटी आणि भयापोटी इस्त्राईलने हा हल्ला केलेला आहे भविष्यात आपल्यावर अणूबॉम्ब पडू नये म्हणून केलेला हा उद्योग आहे त्यामध्ये नेत्यांनाहू यांना आपली हुकूमशाही शाबूत ठेवण्याचीही संधी दिसते आणि त्यामुळे हा निर्णय सत्तेसाठी सुद्धा घेतलेला आहे नरेंद्र मोदी त्यांना मित्र मानतात पण ही मैत्री भारताला परवडणार आहे का हा खरा प्रश्न आहे. चीन या युद्धात मुद्दामच अलिप्त राहील कारण त्यांच्यावर कोणताच हल्ला कुठलेच मुस्लिम राष्ट्र करणे शक्य नाही कारण सगळ्यांचे हितसंबंध चायना मध्ये गुंतलेले आहेत भारत तटस्थ राहिला तर भारतावर हल्ला करण्याचा उद्योग मुस्लिम राष्ट्रे करणार नाहीत अपवाद इराण आणि पाकिस्तान! या दोन राष्ट्रांच्या मुळे भारताचा पंगा होऊ शकतो आणि तसा तो झाला तर सर्वाधिक मोठा chaos मुस्लिम राष्ट्रांच्या आतच होईल कारण भारताशी संबंध कोणालाच बिघडवायचे नाहीत 


एकंदरच गाजा पट्टीपासून सुरू झालेले हे युद्ध महायुद्धात परिवर्तित होऊ शकते ही शक्यता गृहीत धरूनच भारताला पावले टाकावी लागतील युद्ध हा फार महागडा धंदा आहे आणि तो त्यांनाच परवडतो ज्यांना शस्त्रे विकायची असतात 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना