Posts

Showing posts from February, 2025

शैव उत्सव

 मोक्षदा एकादशी बद्दल प्रश्न विचारला आहे म्हणून सांगतो मोक्षदा एकादशी म्हणजे मोक्ष मिळवण्याचा ठाम निश्चय करून भगवान शंकरांनी कैलासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले तो दिवस मोक्षाच्या दिशेने मानव जातीने टाकलेले हे पहिले पाऊल होते म्हणून ते साजरे केले जाते मधल्या काळात मोक्षदा एकादशी गायब झाली होती परंतु पुन्हा एकदा तिचे पुनर्जीवन झालेले दिसते या एकादशीलाच वैष्णव लोकांनी गीता जयंती मानलेले आहे कारण या दिवशी अर्जुनाला भगवदगीता सांगितली गेली अशी त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे वैष्णवांच्या दृष्टीनेही हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे एकंदरच मोक्षाच्या संदर्भात हा दिवस अतिशय महत्त्वाचा असे म्हणायला हरकत नाही हा दिवस कसा साजरा करायचा याची एक पद्धत आहे सर्वसाधारणपणे तुमच्या आसपास ज्याला मोक्ष मिळालेला आहे त्याच्याकडे जाऊन आज मोक्षाची दीक्षा घेतली जाते कोणी आसपास नसेल तर मग शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करणे, अभिप्रेत आहे तुम्ही योगी असाल तर आज संपूर्ण दिवसभर राजयोग करणे गरजेचे आहे तुम्ही ज्ञानोपायी असाल तर तर आजच्या दिवशी ज्ञानो पाय अंमलात आणणे गरजेचे आहे  हीच गोष्ट तंत्र उपाय आणि क्रि...

Swami Vivekanand

 One thing I would tell you, and I do not mean any unkind criticism. You train and educate and clothe and pay men to do what? To come over to my country to curse and abuse all my forefathers, my religion, and everything. They walk near a temple and say, “You idolaters, you will go to hell.” But they dare not do that to the Mohammedans of India; the sword would be out. But the Hindu is too mild; he smiles and passes on, and says, "Let the fools talk." That is the attitude. And then you who train men to abuse and criticise, if I just touch you with the least bit of criticism, with the kindest of purpose, you shrink and cry, "Don't touch us; we are Americans. We criticise all the people in the world, curse them and abuse them, say anything; but do not touch us; we are sensitive plants." You may do whatever you please; but at the same time I am going to tell you that we are content to live as we are; and in one thing we are better off — we never teach our children t...
Pyar rukta Nahi begins on a street in Chandigarh, in the midst of an argument between Godbole, a leader, with moral committement. He has been playing to help party to win elections and Amar and Katrina are helping him' to make his way easy  Both families(Poonam Pawan Nargis and Ahmed) have good relationship with each other and both families know their friendship but nobody is serious about their friendship because they have never openly admitted anything about their love. Suddenly one day something happened and accidentally they touch each other which creates havoc in Chandigarh and  incidents after incidents derailed the whole college and it becomes the talk of town especially in City hall. The whole Chandigarh learned that Katrina is in love with Amar and has supposed to marry Amar, an emerging leader and Mangni is bound to happen. Abid says he hates Amar, who recently passed him over for the position of assistant leadership in favor of the inexperienced Vivek who is at all...

अज्ञान मीमांसा

 ज्ञान आणि अज्ञान मीमांसा श्रीधर तिळवे नाईक युरेशियन परंपरेमध्ये ज्ञानाच्या संदर्भामध्ये सर्वात प्रथम ब्रह्म तंत्र येते या ब्रह्म तंत्रानुसार मीच ब्रह्म आहे हे आत्मज्ञान सर्वात महत्त्वाचे होय याला शह म्हणून गौतम बुद्ध याने आत्मज्ञानाला नकार दिला आणि आत्माच नाकारला पण त्याने ब्रह्माला नकार दिला का तर नाही तर उपनिषदिक वेदांत परंपरेला जे अनिष्ट वळण नंतरच्या काळात लागले ते त्याने दुरुस्त केले होते ब्रह्मतंत्र हे ब्रह्मज्ञानाला सर्वाधिक महत्त्व देते आत्मज्ञानाला सर्वाधिक प्राधान्य देते याउलट गौतम बुद्ध हा अज्ञानज्ञानाला सर्वाधिक प्राधान्य देतो अज्ञान म्हणजे काय तर गौतम बुद्ध यांच्या मते अज्ञान हेच तृष्णेचे मूळ आहे आणि एकदा का या तृष्णांचे आणि तिच्यातून निर्माण होणाऱ्या दुःखाचे योग्य ज्ञान झाले की अज्ञान दूर होते आणि निर्वाणाची प्राप्ती होते आत्ताच्या काळात ही अज्ञान ज्ञानमीमांसा आपण अधिक वाढवू शकतो तिची व्याप्ती वाढवू शकतो आणि  १ आत्मअज्ञान २ कुल अज्ञान ३ कुटुंब अज्ञान  ४ आप्तावळ व आप्त अज्ञान ५ गोतावळ वा गोत अज्ञान  ६ गण अज्ञान ७ मानव अज्ञान  असे अज्ञानाचे सात प्र...

मोक्ष ELCETRA

 श्रीधर तिळवे नाईक  १  समोर पुष्पा  आणि तुझा दोस्त सतत तुझी आठवण काढत  पुष्पां भारतासारखा दिसतो ना दादा ? मी पुष्पाच्या जागी पुष्पां पाहतोय  तुझ्याजागी तू  २ तुझ्यासारखे अनेक असतील  ज्यांना पुष्पा होतं आलं नाही  काय कमी पडलं ? तुझ्या डाव्या हातांची शैली मजबूत होती  धैर्य काठोकाठ होतं  तुझा दोस्त म्हणतोय  "दादा भारतकडं डोकं न्हवतं  तुझ्याकडं तेही होतं " तुझं धैर्य मोक्षाकडे वळलं नाही  मी डोकं धैर्याच्या दिशेनं कधी वळवेन ह्याची वाट पाहत राहीलं  ३ लोकांना मोक्ष नको होता  पण तुलाही नको होता ? आतल्या तडसेवर उपाय म्हणून दारू शोधलीस  हाती काय लागलं ? दारू ? आत ग्लास असतो  आणि तो दारूनं तात्पुरता भरता येतो  किंवा मोक्षाने कायमचा  लोक तात्पुरते का होतात  आणि तुही का झालास तत्पर  तात्पुरत्यासाठी  ४ तुझ्यासारखे कित्येक वाया गेले  मेंदूतल्या जंगलातील लाल चंदन स्मगल करत  रक्तचंदन ही कल्पना आहे  लोक लाल चंदनाने ती भरून काढतात  रक्त चंदन व्हायला  मोक्ष मिळवावा लाग...

चॅनेल श्री वहिनी

 कित्येक गोष्टी अंधुकश्या दिसतायत टिव्ही आल्यापासुन प्रेयसीचा स्तन आईचे मन भावाचा धन बहिणींचा फन भाचीचा रन भाच्याचा मित्रगण सगळं अंधुक होत चाललंय धाकधुक शाबूत ठेवत बायका सोप ऑपेरा पाहतायत आणि अधूनमधून जेवणही वाढतायत पुरुष फेस्टीवल्स आणि कास्टिवल्स दोन्ही अटेन्ड करतायत पोरं कार्निवल्स आणि हॉर्निवल्स दोन्हि एन्जॉय करतायत जे जाहिरातीत आहे ते घरी कधी येतंय ह्याची वाट पाहतायत सगळ्यांचे डोळे जी सोप ऑपेरात आहेत ती सारी भांडणे प्रत्यक्ष घरात कधी एन्ट्री मिळतीये ह्याची वाट पाहत दबा धरून आहेत कौन बनेगा करोडपतीतच मौन आहेत करोडो पती फक्त एक जीभच आहे जिला आपल्या जागी स्वस्थ बसता येत नाहीये ती तिला मिळेल त्या जागी जाऊन बसतीये आणि फॅड काढून वाट बघतीये तिचा डंख हीच इंटरवल किंवा स्पिरिच्युअल ब्रेक श्रीधर तिळवे -नाईक   (चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )

बाळबोध कविता फेब एप्रिल

 Don't quit,  लाईफ is quick . suicide ke bareme sochte sochte निकल जायेगी  श्रीधर तिळवे नाईक  (बाळबोध कविता या काव्यफायलीतून) अंत तक पता ना चला क्या मसला था  क्या दुनिया चलाने वाला कोई खुदा था?  जिंदगी हमेशा इंतजार करती रही मगर पता नही इंतजार किस बातका था हमेशा दिल मेरा टूटते टूटते रह गया  पता नही मेरे अंदर क्या बचा था  तमाम उम्र मैं उनके हमले झेलता रहा उनकी नजरमें मेरा हमला मेरा हौसला था औरत है तो आजमाईश होती रहेगी खुद रामही सीताकी अग्निपरीक्षा था श्रीधर तिळवे नाईक  (बाळबोध कविता या काव्यफायलीतून) बहुजनाचे मोहिनी साठी स्वगत श्रीधर तिळवे नाईक अस्तित्वात नसलेल्या नरकाची गोड शब्दांत दाखवलेली वाट  आणि तरीही कोणी फसला नाही तर भयाचा बांधलेला घाट  बहुजन आहे ही माझ्या रक्तात उधळपट्टी कोणी आहे रचली  समोरचा मागतो साधा रस्सा मी त्याला देऊन टाकतो ताट  बारकावासुद्धा मिळत नाही चालून येतो थेट टोककावा  नंतर कळते त्यानें टाकली होती फार पूर्वीपासून घरात खाट थांबव बाई ग तुझी अदाकारी तिच्यामुळे आमची विकेट जाते  तू दिसतेस मोहिनी स...

निर्वाणा वेळच्या कविता

वय वाढत जातं  तसं स्वतःचं अज्ञान वाढत जातं  जे स्वतःला समजतात सर्व साक्षी  ते धन्य होत  पापुद्रे पाहण्यात हयात गेली  आणि कॉसमॉसचा कांदा तर चिरता आलाच नाही  तीव्र वास येईल म्हणून वाट पाहिली  तर गंध पोहोचायला लाईट ईअर्स लागणार हे कळाले  शेवटी ठरवले  आपण आपल्या अस्तित्वाच्या चाफ्यालाच उमलवत बसवावे  झाडे मोजायला जावे  इतकी आपली लायकी नाही  जंगलाला वाढू द्यावे  आपल्या आसपास  त्यातील काही जगणार  काही पुन्हा जन्मणार  काही मरून जाणार  आपला रोल फक्त आपल्या पुरता आहे  आपण नाटक लिहिले तर  ते आपल्यापलीकडे जात नाही  कोणी सांगितलं जगाचा रंगमंच करायला ? स्वतःची त्वचा माहित नाही  आणि ब्रम्हांडांच्या केंद्रांची व्याख्या करायला निघालेत  भावनांची ताकद प्रथमच कळतीये  त्या कशाशीही जोडून घेता येतात त्यासाठी ज्ञान आवश्यक नसते  आपण कनेक्ट व्हावे  आणि मोकळे ही व्हावे  बाकी जे वीजदार आत चालून येईल  त्याचे बीज वाढू देऊ नये  उलट शून्याची वाट पहावी  आणि ते आत आले की  ...

निर्वाणा वेळच्या कविता

 पूर्वी फक्त शब्दच खोटे असायचे  आणि लोक डोळ्यावर विश्वास ठेव म्हणायचे  आता दृश्येही खोटी झाली  आणि अनुभवही  सगळंच पडद्यातून चालत यायला लागलं  आणि जे चालतं ते खरं की खोटं  डोळ्यांना कळणं मुश्किल झालं  ऑडिशन्स यायच्या  आणि त्यावर विश्वास ठेवता यायचा  आता ए.आयच्या साह्याने कोण काय बदलेल सांगता येत नाही  म्हणजेच पुन्हा एकदा प्रत्यक्षाचे आगमन  जे समोर आहे तिथेही मेकअपचा प्रॉब्लेम आहेच  शिवाय आपल्या नावाने कोण अकाउंट उघडेल  हे सांगणं कठीण  आपल्या किती फेक आयडेंटिटीज कोणा कोणाशी कसला कसला शेक हँड करतायेत कोणास ठाऊक? आपले चेहरे कुठे कुठे डकवले जात आहेत  कोणास ठाऊक? ठोकमपट्टी हीच घोकम पट्टी झालीये ज्यात चाय कम पाणी जास्त  दुधाच्या जागी सुद्धा मिल्क पावडर सेटल  जोवर क्लोन्स आपल्या ताब्यात आहेत तोपर्यंत भीती नाही  पण क्लोन्स ताब्यात आहेत कुठं ? आपल्या या आयडेंटिटीज आपल्याला माहीत सुद्धा नाहीत तिथे ताबा फार दूरची गोष्ट  आपण पसरलोय  आणि आपला पसारा आपल्यालाच माहीत नसावा ? महादेवा  तुझा तिसरा...

बहुजन वाद आणि महाजन वाद

बहुजनवाद की महाजनवाद १ श्रीधर तिळवे नाईक  भारतीय राजकारण असो किंवा समाजशास्त्र असो हल्ली बहुजनवाद हा शब्द त्याच्या केंद्रस्थानी असतो मात्र बहुजन नेमके कोणाला म्हणायचे याबद्दल काही एकमत होत नाही हे असे का होते या प्रश्नाचा एकदा नीट विचार केला पाहिजे  भारतीय समाजामध्ये शेवटी कोण टर्म्स आणि कंडिशन डिक्टेट करतो ते पाहावे लागते आणि मग लक्षात येते की प्रत्यक्षात सामाजिक चलनवलन हे बहुजन कोण या गोष्टीवर ठरत नसून महाजन कोण या गोष्टीवर ठरत असते आणि प्रत्येक जात प्रत्येक वर्ण प्रत्येक समाज हा महाजन होण्याच्या धडपडीत असतो कोणालाही बहुजन बनायचे नसते साहजिकच त्यातूनच मग महाजनीकरण नावाची एक प्रोसेस बनते आणि त्याला काउंटर म्हणून बहुजनिकरण अशी उलटी प्रोसेस महाजन लोकांच्याकडून सुरू होते भारतीय इतिहास म्हणजे महाजनीकरण आणि बहुजनिकरण यांचे आपापसामध्ये झालेले टकराव होय विशेषतः इसवी सन १००० नंतर हे सातत्याने घडलेले आहे कारण युरेशियन धर्म हे पूर्णपणे केंद्रस्थानी आलेले आहेत साहजिकच अपकास्टिंग आणि डीकास्टिंग या गोष्टी सातत्याने घडलेल्या दिसतात आणि यांची दिशा ही नेहमीच महाजन कोण या दिशेने असते बहुजन को...

Decathlon कर्म

सगळ्यांचं सगळं ऐकून घ्यावं  मग कान सोडून निघून जावं  जो तो स्वतःचा प्रचार करणारच  किती नादायाचं आपण ठरवावं  सर्वच बिलंदर बिळेच तयार होणार  प्रत्येकाला त्याच्या बिळात राहू द्यावं  व्यवस्था कोणालाही बदलायची नाही  आपण कोणालाही सामील ना व्हावं  तृष्णा कोणालाही सुटत नाही  आपण प्रत्येकाची गंगा व्हावं  मायेच्या नावाने कारभार करावा  मोक्ष मिळवून इथून पसार व्हावं  श्रीधर तिळवे नाईक  (डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन कर्म या काव्य फायलीतून)  उंबरठा श्रीधर तिळवे नाईक  ज्या ठिकाणी तुला फुकट वस्तू मिळतात ती फॅमिली  ज्या ठिकाणी तुला किंमत द्यावी लागते तो समाज  उंबऱ्याच्या आत नातेवाईक  उंबऱ्याच्या बाहेर बाजार  हा जो उंबरठा आहे हा काल्पनिक नाही  तो जितका घरात आहे  तितकाच तो समाजात आहे  जेव्हा जेव्हा ओलांडशील  तेव्हा दहा वेळा विचार कर  त्याच्या बाहेर फक्त बाजार आणि राष्ट्र राष्ट्र म्हणजे संविधानाने केलेले कायदे आणि संविधान  त्या संविधानाने उभी केलेली व्यवस्था  राष्ट्रात राहतोस म्...